Goa-Mumbai Vande Bharat Express Dainik Gomantak
गोवा

Vande Bharat : Mumbai -Goa मार्गावरही आता ‘वंदे भारत’ रेल्वे

‘वंदे भारत’ प्रतितास 160 किलोमीटर वेगाने धावते

दैनिक गोमन्तक डिजिटल

Vande Bharat : देशभरात भारतीय रेल्वे विभागातर्फे ‘वंदे भारत’ ही नवी वेगवान रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार मुंबई ते गोवा मार्गावरही ‘वंदे भारत’ रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज दिली.

महाराष्ट्रातील (कोकण) एका शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची भेट घेतली. सध्याच्या घडीला ‘वंदे भारत’ ही रेल्वे सेवा सर्वांत वेगवान मानली जाते. प्रतितास 160 किलोमीटर या वेगाने ती धावत असल्याने अनेक राज्यांत ही सेवा सुरू झाली आहे.

सध्या कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दर आठवड्याला मुंबई ते गोवा या मार्गावर लाखो रेल्वे प्रवासी प्रवास करतात. ही दोन्ही ठिकाणे प्रवासी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची असल्याने या मार्गावर ही सेवा सुरू करणे आवश्‍यक असल्याचे या शिष्टमंडळाने मंत्री दानवे यांना सांगितले.

मुंबई ते गोवा रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे लवकरच ही सेवा सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 'ही' मागणी मंजूर झाल्यास पगारात 51 हजार रुपयांची वाढ होणार

Viral Video: फुटबॉल सामन्यात अचानक गाईची एन्ट्री; मैदानावर दाखवली भन्नाट ड्रिब्लिंगची कला! व्हिडिओ व्हायरल

FIFA World Cup 2026: मेक्सिकोची बाद फेरी निश्चित, गोलरक्षक किम सेऊंगची चूक दक्षिण कोरियाच्या मुळावर

खरी कुजबुज: शिवसेनेची शर्यत!

Goa Tourism: देशांतर्गत पर्यटकांचा ओघ कायम, मे महिन्यात 4.53% वाढ; 46.39 लाख पर्यटकांची नोंद

SCROLL FOR NEXT