Goa-Mumbai Vande Bharat Express Dainik Gomantak
गोवा

Vande Bharat : Mumbai -Goa मार्गावरही आता ‘वंदे भारत’ रेल्वे

‘वंदे भारत’ प्रतितास 160 किलोमीटर वेगाने धावते

दैनिक गोमन्तक डिजिटल

Vande Bharat : देशभरात भारतीय रेल्वे विभागातर्फे ‘वंदे भारत’ ही नवी वेगवान रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार मुंबई ते गोवा मार्गावरही ‘वंदे भारत’ रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज दिली.

महाराष्ट्रातील (कोकण) एका शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची भेट घेतली. सध्याच्या घडीला ‘वंदे भारत’ ही रेल्वे सेवा सर्वांत वेगवान मानली जाते. प्रतितास 160 किलोमीटर या वेगाने ती धावत असल्याने अनेक राज्यांत ही सेवा सुरू झाली आहे.

सध्या कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दर आठवड्याला मुंबई ते गोवा या मार्गावर लाखो रेल्वे प्रवासी प्रवास करतात. ही दोन्ही ठिकाणे प्रवासी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची असल्याने या मार्गावर ही सेवा सुरू करणे आवश्‍यक असल्याचे या शिष्टमंडळाने मंत्री दानवे यांना सांगितले.

मुंबई ते गोवा रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असल्यामुळे लवकरच ही सेवा सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

SCROLL FOR NEXT