कला क्षेत्रात अनेक उत्तम संधी आहेत. उत्तम कलाकार होण्यासाठी चांगला श्रोता होण्याची गरज आहे. मातृभाषेतूनच आपण खऱ्या अर्थाने घडतो. म्हणून तिचा कधीही विसर पडता नये, असे प्रतिपादन प्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर यांनी केले.
गोवा मराठी अकादमीतर्फे साखळी येथे आयोजित चौथ्या राज्यस्तर मराठी साहित्य संमेलनात रविवारी गुरू ठाकूर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.
पत्रकार परेश प्रभू, प्रा. पौर्णिमा केरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत ठाकूर यांनी कवी, गीतकार असा प्रवास उलगडला.
ठाकूर म्हणाले, आपण मूळ मातीशी जोडले गेले पाहिजे. ती नाळ कधीही तुटता नये. कवीपेक्षा गीतकार ही ओळख मला अधिक भावते. कविता गाणं स्वरूपात अधिकाधिक दूर पोहोचविता येते.
पूर्वीच्या काळी आधी कविता होत असे, त्यावर गाणी बनायची; परंतु आता प्रथम चाल होते आणि त्यावर शब्द रचना करावी लागते. चालीवर गीत लिहिणे कठीण असते, तसेही ते म्हणाले.
गोव्याशी जुने नाते-
गोव्याशी आपले फार पूर्वीपासून नाते आहे. आपले काही नातेवाईक येथे असल्याने आपला नेहमीच गोव्याशी संबंध आला आहे. या भूमीत आल्यानंतर आत्मानंद लाभतो, असेही ठाकूर यांनी ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.