डिचोली: खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्णय मुळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत घेण्यात आला. त्यासाठी खाणपट्टा भागातील गावोगावी जनजागृती करण्याचेही ठरविण्यात आले. डिचोली तालुक्यातील खाणपट्टा भागातील खाणग्रस्त नागरिकांची जाहीर सभा शनिवारी मुळगाव येथील श्री केळबाई मंदिरात आयोजित करण्यात आली होती.
मुळगावच्या सरपंच सुहासिनी गोवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला पर्यावरण अभ्यासक रमेश गावस, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर, मुळगाव देवस्थानचे अध्यक्ष कृष्णनाथ परब, शेतकरी संघटनेचेअध्यक्ष प्रकाश परब, सभेचे निमंत्रक सचिन मयेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते आनंद गाड आदी उपस्थित होते.सरकार हे खाणमालकांच्या हातातील बाहुले बनले असून, त्यामुळेच खाणमालकांचे लाड होत आहेत आणि त्यांना हवे ते सरकारकडून मिळत आहे, असा आरोप पर्यावरण अभ्यासक रमेश गावस यांनी केला.
सचिन मयेकर यांनी खाणोंमुळे जनतेला कोणते परिणाम भोगावे लागत आहेत, याबाबत माहिती दिली. यावेळी वसंत गाड, प्रकाश परब, संकटातून मुक्त करा सरकारला कोटी रुपये दान देण्याऐवजी 'वेदांता'ने खाणी बंद करून जनतेला संकटातून मुक्त करावे, अशी मागणी पर्यावरण अभ्यासक रमेश गावस यांनी यावेळी केली. स्वप्नेश शेर्लेकर तसेच अडवलपाल येथील आनंद गाड यांनीही विचार मांडले. सरकारला जनतेच्या सुखदुःखाचे काहीच पडलेले नसून उलट खाण कंपन्यांचेच लाड करण्यात येत आहेत, असा आरोप वक्त्यांनी करत सरकारवर टीका केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.