Margao  Dainik Gomantak
गोवा

Margao News : आश्‍चर्यम! रणरणत्‍या उन्‍हात लोटली येथे फुलली अळंबी

गोमन्तक डिजिटल टीम

सुशांत कुंकळयेकर

Margao News :

मडगाव, पाऊस आला की अळंब्‍याच्‍या छत्र्या उगवतात, अशी एक सर्वमान्‍य म्‍हण आहे. मात्र निसर्गाच्‍या या चक्राला छेद देणारी एक आश्‍चर्यकारक घटना सासष्‍टीत घडली आहे.

सध्‍या संपूर्ण राज्‍यात ऊन रणरणत असताना लोटली येथील एका भाटात चक्‍क ‘रोयण अळंबी’ फुलल्‍याची नोंद झाली आहे. सासष्‍टीत ऐन मे महिन्‍यात अळंबी फुलण्‍याची ही पहिलीच घटना असल्‍याने या घटनेला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्‍त झाले आहे.

लोटली येथील सायोनारा दांताश क्‍वाद्रूश यांच्‍या भाटात ही अळंबी फुलली असून काल गुरुवारी ही अळंबी फुलून वर आल्‍याचे दिसून आले.

वास्‍तविक या पूर्वी कोळंब-रिवण येथे मार्च महिन्‍यात अळंबी फुलून आली होती. मात्र मे महिन्‍यात अळंबी फुलण्‍याची ही पहिलीच घटना असून त्‍यातही सासष्‍टीत अशी अवकाळी अळंबी फुलायची ही पहिलीच घटना आहे.

अळंबी या विषयावर संशोधन केलेले आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे शास्‍त्रज्ञ डॉ. नंदकुमार कामत यांनी या घटनेबद्दल बोलताना, एरव्‍ही पावसाळ्‍यात सासष्‍टीत कित्‍येक ठिकाणी रोयण अळंबी सापडतात. मात्र मे महिन्‍यात सासष्‍टीत अळंबी उगवण्‍याची ही पहिलीच घटना आहे.

लोटली येथे जी अळंबी उगवली आहेत त्‍याला शास्‍त्रीय भाषेत ‘टर्मिटोमायसीस हेईमी’ असे नाव असून या अळंब्‍याची गोव्‍यात सर्वांत जास्‍त विक्री होते अशी माहिती त्‍यांनी दिली. मे महिन्‍यात अळंबी उगवण्‍यासंदर्भात बोलताना डॉ. कामत म्‍हणाले, ही अळंबी उगवणाऱ्या वाळवीने आता बदलत्‍या वातावरणाशी जुळवून घेतले आहे हे स्‍पष्‍ट होत आहे. यासंदर्भात आपले संशोधन अजूनही जारी असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

अळंब्‍यांवर बाराही महिने संशोधन सुरूच

पूर्वी फक्‍त पावसातच उगवणारी अळंबी आता उष्‍ण वातावरणातही उगवू लागली आहेत. बदलत्‍या निसर्गाच्‍या चक्राशी अळंबीच्‍या वाळवीने जुळवून घेतल्‍यामुळेच ही आश्र्‍चर्ये घडत आहेत. अळंब्‍याच्‍या या बदलत्‍या कालचक्रावर वर्षाच्‍या बाराही महिने संशोधन चालूच असते असे डॉ. नंदकुमार कामत यांनी सांगितले. अशी अळंबी सापडल्यास माहिती द्या, असे कामत यांनी सांगितले.

रोयण अळंबी पूर्णत: खुडून काढू नका : कामत

सासष्‍टीत सध्‍या उगवलेले अळंब्‍यांसह एकूण पाच जातीची अळंबी सापडतात. मात्र ही अळंबी बहुतेक पावसाच्‍या दिवसांतच उगवतात. उगवलेली रोयण अळंबी पूर्णत: खुडून काढली जाऊ नयेत कारण नवीन अळंबी उगवण्‍यासाठी वाळवींना ही अळंबी आवश्‍‍यक असतात, असे कामत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT