Mango & Cashew Season
Mango & Cashew Season Dainik Gomantak
गोवा

Mango & Cashew Season: लहरी हवामानामुळे आंबा-काजू बागायतदार चिंतेत

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यासह लगतच्या सिंधुदुर्गात आंबा काजूच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदा थंडी बऱ्यापैकी पडल्याने भरघोस उत्पादन मिळण्याचा बायतदारांचा अंदाज होता. मात्र गेले 2-3 दिवस राज्यात ढगाळ हवामान असून या बदलत्या वातावरणाचा आंबा काजू बागायतदारांना सामना करावा लागत आहे. (Impact Of Weather On Mango & Cashew Season)

काल आणि आज राज्यात ढगाळ हवामान होते. आंबा काजू झाडाला मोहोर आल्यानंतर ढगाळ हवामान निर्माण झाल्याने फळधारणा कमी प्रमाणात होते. तसेच आलेला मोहोर करपण्याचीही दाट शक्यता असते. परिणामी हातातोंडाशी आलेलं पीक खराब होऊन नुकसान होण्याची भीतीही व्यक्त होतेय.

ढगाळ वातावरणामुळे आंबा आणि काजू पिकांची मोहर प्रक्रिया पुढे जाण्याची शक्यता आहे. अजून काही दिवस हे वातावरण असेच राहिले तर यावर्षी फवारणीसह मशागतीच्या कामासाठी झालेला खर्चही बागायतदारांच्या उत्पादनातून मिळणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील वर्षीही अवकाळी आणि बदलत्या हवामानामुळे काही ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचं चित्र दिसत होते. मात्र यंदा तरी भरघोस पीक हाती यावं हीच बागायतदारांची इच्छा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pallavi Dempo: पल्लवी धेंपे म्हणतात... मला गरिबांच्या समस्या कळतात!

Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

High Tide Alert For Panaji: पणजीसाठी 22 दिवस धोक्याचे; पावसाळ्यात उसळणार 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

Vishwajit Rane On Congress: काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

SCROLL FOR NEXT