jharkhand worker died in train accident Dainik Gomantak
गोवा

रोजगारासाठी गोव्यात येण्यापूर्वीच घात झाला, ट्रेनमध्ये चढताना मजुराचा पाय घसरला अन्...

गुमला येथील एक व्यक्ती रोजगारासाठी गोव्यात येत असताना अर्ध्या रस्तात त्याच्यावर काळाने घाला केला.

Pramod Yadav

देशातील अनेक राज्यातून रोजगारासाठी लोक गोव्यात येत असतात. पण, प्रवासादरम्यान, काहीतरी घटना घडल्याने काही जणांनी जीव गमावल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. अशीच एक घटना गुमला, झारखंड येथून समोर आली आहे. गुमला येथील एक व्यक्ती रोजगारासाठी गोव्यात येत असताना अर्ध्या रस्तात त्याच्यावर काळाने घाला केला.

(jharkhand worker died in train accident while coming to Goa in search of work)

मिळालेल्या माहितीनुसार, गुमला जिल्ह्यातील बिरकेरा गावातील 35 वर्षीय राजेश गोव्याला नोकरी करण्यासाठी येत होता. दरम्यान, अर्ध्या रस्त्यात रायचुरा जंक्शनवर ट्रेनमध्ये चढत असताना तोल गेल्याने तो पाय घसरून पडला.

दरम्यान, भरधाव येणाऱ्या रेल्वेने त्याला जोराची धडक दिली, त्यात तो गंभीर जखमी झाला. दोन सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ दवाखान्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. दरम्यान, त्याच्या मृत्यूमुळे मजुराच्या घरावर शोककळा पसरली आहे.

तीन लहान मुलांचे शिक्षण आणि घरातील सर्व गरजेचा खर्च तो भागवत असे.

मजुराच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर मजूर युनियन सीएफटीयूआय झारखंडचे राज्य सचिव जुमन खान यांनी स्थलांतरित कामगार विभाग नियंत्रण कक्ष, गुमला जिल्हा आणि झारखंड राज्य नियंत्रण कक्ष यांना ही माहिती देत मजुराचा मृतदेह परत आणण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT