डिचोली, सुराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव दूरदृष्टीचे राजा होते. गोव्यासाठी त्यांनी दिलेले योगदान न विसरण्यासारखे आहे. त्यांच्यामुळेच हिंदू धर्म आणि संस्कृती टिकली.
शिवरायांमुळेच बरीचशी मंदिरेही सुरक्षित राहिली, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षपूर्तीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या डिचोली नगरीत आयोजित शासकीय पातळीवरील सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतील उत्कृष्ट प्रशासन आदी बऱ्याचशा गोष्टी या शिकण्यासारख्या आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
डिचोलीसह प्रत्येक शिवप्रेमींना शिवरायांबद्धल आदर असल्याचे नमूद केले. आमदार प्रेमेंद्र शेट आणि चंद्रकांत शेट्ये यांनीही यावेळी आपले विचार मांडताना छत्रपती शिवरायांची थोरवी सांगितली.
मुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन
सर्वप्रथम आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शहरातील जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन छत्रपतींना अभिवादन केले. यावेळी नगराध्यक्ष कुंदन फळारी तसेच नगरसेवक, शिवप्रेमी, उपजिल्हाधिकारी आणि विविध सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंतर छत्रपती शिवाजी महाराज सर्कलवरील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’आदी घोषणा देत शिवप्रेमींनी परिसर दुमदुमून सोडला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.