Green Economy  Dainik Gomantak
गोवा

Green Economy : हरित अर्थव्यवस्थेत गोवा पिछाडीवर, केरळ टॉपवर

Green Economy In Goa : २०१८ पासून नीती आयोगातर्फे देशातील सर्व राज्य, केंद्र शासीत प्रदेशांमध्ये शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, मूलभूत सोयी, गरिबी निर्मूलन आदी क्षेत्रातील राज्यांची कामगिरी लक्षात घेतली जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, नीती आयोगातर्फे देशभरात केलेल्या ‘शाश्‍वत विकास मूल्यांकनात'' (एसडीजी) या वर्षी २०२३-२४ मध्ये गोव्याने तृतीय स्थान पटकावले तरी हरित अर्थव्यवस्था, प्लास्टिक कचरा निर्मिती नियंत्रण, अन्नाची नासाडी अशा महत्त्वाच्या क्षेत्रात गोवा मागे पडला आहे.

आयोगाने जारी केलेल्या विविध निकषांवर गोवा राज्याने ७७ गुणांची कमाई करीत हे यश मिळविले आहे.

केरळ आणि उत्तराखंड ही दोन राज्ये ७९ गुणांसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. तर दुसऱ्या स्थानावर ७८ गुणांसह तामिळनाडू आहे. बिहार राज्य सर्वात शेवटच्या स्थानी राहिले असून, गुणांची सरासरी ७१ निश्‍चित झाली होती.

२०१८ पासून नीती आयोगातर्फे देशातील सर्व राज्य, केंद्र शासीत प्रदेशांमध्ये शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, मूलभूत सोयी, गरिबी निर्मूलन आदी क्षेत्रातील राज्यांची कामगिरी लक्षात घेतली जाते. २०२०-२१ मध्ये झालेल्या मूल्यांकनात गोव्याने चौथे स्थान पटकावले होते.

यात चांगले गुण

गतवर्षी गोव्याने स्वच्छ पाणी, स्वच्छता, वीज पुरवठा अशा मूलभूत सुविधांमध्ये चांगली गुणांची कमाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT