Morjim Beach Dainik Gomantak
गोवा

Morjim Beach: 'नियम बसवले धाब्यावर' 10 वाजल्यानंतरही सुरु असलेली पार्टी पोलिसांनी पाडली बंद

Morjim Beach: गोवा उच्च न्यायालयाने किनारी भागात रात्री 10 वाजल्यानंतर पार्टी करण्यावर निर्बंध घातले आहेत.

दैनिक गोमन्तक

Morjim Beach: गावडेवाडा-मोरजी येथील मार्बेला बीच रिसॉर्टमध्ये काल रात्री संगीतरजनी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाने रात्री दहा वाजेपर्यंत परवाना दिला होता. परंतु 10 वाजल्यानंतरही पार्टी सुरू राहिल्याने सव्वादहा वाजता ही पार्टी पोलिसांनी बंद पाडली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किनारी भागात खुल्या जागेत रात्री 10 वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारची संगीतरजनी पार्टी आयोजित करण्यावर निर्बंध घातले आहेत. दहा वाजल्यानंतरही ध्वनिप्रदूषण सुरू राहिले तर पोलिस अधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. त्यानुसार मार्बेला रिसॉर्टवर काल ही कारवाई करण्यात आली. तुये येथील एका नागरिकानेही पोलिसांकडे लेखी तक्रार करून या रिसॉर्टने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे म्हटले आहे.

आणखी एक उल्लंघन

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर (Jit Arolkar) यांनीही, न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करायला हवे, असे सांगितले. मात्र, मांद्रे रिवा रिसॉर्टमध्येही रात्री दहानंतर पार्टी सुरू असते, अशी माहिती रहिवासी आग्नेलो फर्नांडिस यांनी दिली. त्यांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, संबंधितांवर कारवाई होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT