पणजी: राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असले, तरी सत्तरी तालुक्यावर पावसाची जोरदार कृपादृष्टी कायम आहे. वाळपईत आतापर्यंत तब्बल २,५५२ मिमी (१००.४७ इंच) पावसाची नोंद झाली असून, पावसाचे ‘शतक’ पूर्ण झाले आहे.
काणकोण, धारबांदोडा, केपे, सांगे आणि साखळी परिसरातही चांगला पाऊस होत आहे. मात्र, मुरगाव, दाबोळी आणि राजधानी पणजीत अद्याप ५० इंचांचाही टप्पा गाठलेला नाही. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांना पावसाऐवजी कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात सरासरी ७.९ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत राज्यात १,८०५ मिमी (७१ इंच) पाऊस झाला असून, ३० टक्के तूट कायम आहे. पुढील आठवड्यातही पाऊस कमी राहण्याची शक्यता असून तुरळक सरींचा अंदाज आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात चिंतेत टाकणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत आता समाधानकारक वाढ झाली आहे. सर्व धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असून, अंजुणे धरणाची पातळीही वाढल्याने सोमवारी त्याचे दरवाजे उघडण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.