Ramakant Khalap: आपले संविधान आणि लोकशाही अतिशय प्रगल्भ तसेच प्रत्येक भारतीयाने अभ्यासण्यासारखी आहे. काळानुसार राज्यघटना नव्हे तर कायद्याची पद्धत, प्रक्रिया काही प्रमाणात बदलत गेली. याच कायद्याची आणि संविधानाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे.
कायदा सर्वांसाठी समान आहे. त्याचे रक्षण करणे तसेच त्यावर विश्वास ठेवून त्याचे पालन करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कायदामंत्री तथा गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी केले.
गोमन्तक यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि गोविंद रामनाथ कारे कायदा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात खलप बोलत होते. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सॅबा डिसिल्वा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या संविधान दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संविधानाची प्रस्तावना वाचून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
प्रारंभी आकांक्षा गेहलोत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अफसान बी यांनी सूत्रसंचालन तर निहारिका च्यारी यांनी आभार मानले. व्याख्यानानंतर ‘फोर्टनायप’ महोत्सवाचे उद्घाटन खलप यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
विद्यार्थ्यांना कथन केले अनुभव
रमाकांत खलप यांनी आपल्या आयुष्यातील वकिली व्यवसायातले तसेच कायदा मंत्री म्हणून आलेल्या असंख्य अनुभवांचे कथन विद्यार्थ्यांसमोर केले आणि कायद्याचे भविष्य हे तरुणांच्या हातात असल्याची जाणीव देखील त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
''राज्यघटना आणि काळानुसारची आव्हाने'' या विषयवार त्यांनी मार्गदर्शन केले. नुकत्याच झालेल्या संविधान दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संविधानाची प्रस्तावना वाचून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.