Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

'सां जुझे' प्रकरणी कायदेशीर औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक होते; निवडणूकाजवळ आल्यानेच ‘ध्रुवीकरण’ सुरू- पाटकर

Goa Congress: फुटीरतावादी शक्तींना आपल्यात फूट निर्माण करू देऊ नका- पाटकर

Ganeshprasad Gogate

Goa Congress: छत्रपती शिवाजी महाराज हे दडपशाहीविरुद्ध लढणारे आणि जनतेच्या हक्कांसाठी उभे राहिलेले नेते होते. त्यांचा समतेवर विश्वास होता. छत्रपतीनी सर्व जाती-धर्मातील लोकांना आदराने वागवले, असे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

सांव जुझे दे आरीएल येथे छत्रपती शिवाजींच्या पुतळ्याच्या स्थापनेदरम्यान झालेल्या सामाजिक तणावाच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून तसेच आवश्यक परवानग्या घेतल्याची खात्री करुनच सदर पुतळ्याची स्थापना करणे ही समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांची नैतिक जबाबदारी होती.

स्थानिक लोकांना विश्वासात घेवूनच कोणताही उपक्रम हाती घेणे नेहमीच फायद्याचे असल्याचे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भाजपने पुन्हा एकदा ‘ध्रुवीकरण’ सुरू केल्याचे दिसते. गोव्यात जातीय सलोखा राखण्यासाठी मी शांतताप्रिय गोमंतकीयांना नम्रपणे आवाहन करतो.

फुटीरतावादी शक्तींना आपल्यात फूट निर्माण करू देऊ नका, असे आवाहन अमित पाटकर यांनी केले.

समाजकल्याण आणि पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई सां जुझे दी अरीयाल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आनावरण करुन परतत असताना त्यांच्यावर मातीफेक करण्यात आली.

जमावाने फळदेसाई यांच्या दिशेने मातीफेक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यात जमावावर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. मात्र धार्मिक सलोखा राखण्यासाठी याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करणार नसल्याचे स्पष्टीकरण फळदेसाई यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT