गेल्या दोन वर्षांपासून कला अकादमीची वास्तू दुरुस्त करण्याच्या नावाखाली कला अकादमीचे वर्ग आल्तिनो-पणजी येथील क्वाटर्समध्ये हलविले आहेत. पण, गोव्याच्या वेगवेगळ्या भागांतून बसने आपल्या मुलांना घेऊन येणाऱ्या पालकांना आल्तिनोपर्यंतचा हा प्रवास म्हणजे द्राविडी प्राणायामच ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक त्रस्त झाले आहेत. त्यांचा हा त्रास कधी कमी होणार, असा सवाल पेडणे तालुका विकास समितीने कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना विचारला आहे.
मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, प्रोत्साहन मिळावे म्हणून अनेक पालक आपल्या मुलांचा कला अकादमीत प्रवेश करतात. अकादमीत असलेले मोजकेच फॅकल्टी जीव तोडून मुलांना प्रशिक्षण देतात; परंतु गेल्या दहा वर्षांपासूनचा इतिहास बघितल्यास काही फॅकल्टींची कोर्स देण्याची पद्धती म्हणजे ‘रामभरोसे’च आहे. अकादमीचे वर्ग दुसरीकडे नेण्याचा निर्णय घेताना महत्त्वाचा वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेणे जरूरीचे होते.
अकादमीत शिक्षण घेणाऱ्या मुलांचे व त्यांच्या पालकांचे वय, त्यांची मानसिकता आणि वाहतुकीची व्यवस्था याचा अभ्यास व नियोजन महत्त्वाचे होते ते केलेले दिसत नाही. मे महिन्यात कांपाल येथील कला अकादमी सुरू करणार म्हणून मंत्र्यांनी वेळोवेळी या वास्तूचा विषय येताच तुणतुणे जनतेला ऐकविले आहे. ..
विद्यार्थी-पालकांची धावाधाव थांबवा
लहानवयातील मुलांना आणि पालकांना त्रासातून मुक्त करण्यासाठी हेच वर्ग कला व संस्कृती भवन पाटो-पणजी येथे स्थलांतरित करता आले नसते का? असा सवाल पेडणे तालुका विकास समितीचे अध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी उपस्थित करून आता कला अकादमीची कांपाल-पणजी येथील वास्तू लवकरात लवकर सुरू करून विद्यार्थी-पालकांची होणारी धावाधाव एकदाची बंद करा, अशी मागणीही केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.