चोर्ला घाटातून (Chorla Ghat) अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला असताना देखील या मार्गावरून नियमित अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa: चोर्ला घाटातून अवजड वाहनांची वाहतूक सुरुच

दैनिक गोमन्तक

पर्ये: उत्तर गोवा (North Goa) जिल्हाधिकाऱ्यांनी 1 जुलै पासून चोर्ला घाटातून (Chorla Ghat) अवजड वाहनांची वाहतूक (Transportation) बंद करण्याचा आदेश दिला असताना देखील या आदेशाची पायमल्ली करून रात्रीच्या वेळी या मार्गावरून नियमित अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे.

घाटाच्या सुरक्षरेच्या दृष्टीने 1 जुलै ते 21 डिसेंबर 2021 पर्यत असे सहा महिने या घाट मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा आदेश आहे. पण याचे पालन होत नसल्याने या पावसाच्या दिवसांनी घाटातून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे घाटाचा रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे. पण सरकारी यंत्रणा या रस्त्याच्या सुरक्षतेसाठी कोणतेही पावले उचलत नसल्याचे दिसून येते.

सरकारचे संशयास्पद धोरण

दरम्यान सरकारच्या एकंदर या प्रकाराबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. सरकार एका बाजूने चोर्ला घाट मार्ग अवजड वाहनांना बंदीचा आदेश काढते आणि प्रत्यक्षात घाटातून वाहनांना येण्याची बंदीसाठी काहीच उपाय योजना आखत नाही असे दिसते त्यामुळे सरकारला यातून काय साधावे हे समजत नाही. कारण जर घाटातून अवजड वाहतुकीस बंदी घातल्यास त्याची अंमलबजावणी करण्यासाठी घाट माथ्यावर गोवा सीमेच्या हद्दीवर वाहनांना प्रतिबंध करण्याची यंत्रणा उभारायला हवी होती पण तशी काहीच यंत्रणा उभारली नाही. तेव्हा अशा यंत्रणा अभावी बेळगाव भागातून येणारी वाहने सरळ घाटातून खाली येतात आणि आदेशाची पायमल्ली होते. त्यामुळे सरकारने चोर्ला घाटावरचा चेक नाका उभारला अशी मागणी होत आहे. पण अशी यंत्रणा उभारली नसल्याने सरकारचे हे धोरण संशयास्पद वाटते.

केरी वाहतुक तपासणी नाक्यावर होते अडवणूक

जेव्हा अवजड वाहने चोर्ला घाट उतरून खाली येतात तेव्हा केरी येथे वाहतूक चेक नाक्यावर ती अडवली जातात. त्यावेळी अशा वाहनाकडे दोन पर्याय राहतात. एक तर आलेल्या मार्गाने पुन्हा परतायचे किंवा सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याने दंड भरायचा. अशा वेळी वाहनदारक दंड वसूल करून गोव्यात प्रवेश करतात. असे प्रकार हे नित्याचेच बनले असून सरकारचा घाटमार्ग बंदीचा आदेश हा केवळ कागदावर राहिलेला आहे.

दररोज 70-80 अवजड वाहने उतरतात घाटातून

कर्नाटकातून गोव्यात मालवाहू करणारे यापूर्वी अनमोड घाटातून येत असत पण आता अनमोड घाट खराब झाल्याने तो अवजड वाहतुकीस बंद केला आहे. अनमोड घाटाच्या पूर्वीच चोर्ला घाट बंदीचा आदेश होता. बेळगाव व परिसरातून गोव्यात येण्यासाठी आंबोली घाट व कारवार मार्ग असे दोन मार्ग वाहतुकीस परवानगी आहे. पण बेळगावतील ट्रक आंबोली अथवा कारवार मार्गे जर गोव्यात आल्यास त्यांना इंधनाचा खर्च बराच येतो. अशावेळी चोर्ला घाटातून येऊन दंड वसूल करणे त्यांच्यासाठी फायद्याचे आहे त्यामुळे बंदीचा आदेश मोडून ही वाहतूक राजरोजपणे सुरू आहे.

या मार्गावरून असे वाहन आल्यावर त्यांना सरकारी आदेशाचे उल्लंघन आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने रुपये 600 ते 1200 च्या आसपास दंड वसूल करावा लागतो. हा दंड त्यांच्यासाठी आंबोली अथवा कारवार मार्गाच्या खर्चापेक्षा कमीच आहे त्यामुळे वाहने या मार्गाचा अवलंब करतात.

या मार्गातून दररोज सुमारे 70-80 अवजड वाहने वाहतूक करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यातून सरकारला मोठया प्रमाणात महसूल प्राप्त होत आहे. त्यामुळे सरकार हा आदेश महसूल गोळा करण्यासाठीच काढला का असा संशय यातून येतो.

अवजड वाहतूकदारांची लूट

सरकारने चोर्ला घाट वाहनांना बंदीचा आदेश काढताना त्याच्या कारवाईसाठी काहीच यंत्रणा राबवायला हवी होती. त्यासाठी सरकारने चोर्ला घाटाच्या गोवा- कर्नाटक सीमेवर तपासणी नाका उभारून तिथूनच अशा वाहनाचा प्रवेश प्रतिबंध करायला हवा होता पण असे न करता वाहनांना घाट मार्ग उतरायला मोकळीक देणे आणि खाली आल्यावर त्यांना दंड वसूल करणे ही एक प्रकारची वाहतुकदारांची लूट आरंभली आहे. दरम्यान केरी चेक नाक्यावर अशा वाहतुदरकडून मनमानीप्रमाणे दंड वसूल केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातून त्यांची लुटच आरंभली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT