पणजी: गोवा राज्यात पुढचे पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. समुद्रकिनारी आणि नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना काळजी घ्यावी अशी सूचना देण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या जोरामुळे पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
मागचे काही दिवस राज्यात, पणजी परिसरात अनेक ठिकाणी रिमझिम आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. वेधशाळेने यापूर्वी ११ ते १४ ऑगस्ट या कालावधीत ‘ग्रीन अलर्ट’ घोषित केला होता.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना पूरप्रवण भागात सावधगिरी बाळगण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि हवामान विभागाच्या अद्ययावत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पणजी, मडगाव, फोंडा, वास्को आणि परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेती, मासेमारी आणि वाहतूक क्षेत्रांनाही हवामानातील बदलांसाठी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.