Goa Market Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोविड छायेत दोन दिवसांत 100 कोटींवर उलाढाल!

गोव्यात ऐन सणासुदीत ‘एटीएम’ रिकामे

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: राज्यात (Goa) चतुर्थी (Ganesh Chaturthi) हा आनंदाचा उत्सव. त्यामुळे कोविडच्या छायेत लोक आर्थिक तंगीत असतानाही खरेदी करण्यासाठी हात आखडता घेत नाहीत हे गेल्या दोन दिवसांतील बाजारपेठेतील (Market) उलढालीवरून दिसून आले. दोन दिवसांत राज्यात तब्बल 100 कोटींहून अधिक उलाढाल झाल्याची माहिती व्यावसायिकांकडून मिळत आहे.

मडगाव, पणजी व म्हापसा या मुख्य तीन बाजारपेठांत झालेली खरेदी दिलासादायक असून मडगावात तीन दिवसांत 40 कोटींची उलाढाल असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. एरव्ही कितीही काटकसर केली तरी चतुर्थीच्या वेळी खरेदी करण्यास गोवेकर हात आखडता घेत नाहीत. खाद्यपदार्थ, कपडे, मिठाई आणि शोभेचे सामान या वस्तूंना लोकांची मागणी जास्त होती. त्यामानाने इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहन खरेदी या क्षेत्राला तुलनेने कमी प्रतिसाद मिळाल्याची माहिती उद्योग क्षेत्रातून मिळाली.

काकुलोज या प्रसिद्ध मॉलचे प्रवर्तक मनोज काकुलो यांना विचारले असता, गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला होता. लोक खरेदीसाठी यावेळी घरातून बाहेर आले. शेवटच्या दोन दिवसांत लोकांनी मॉल्समध्ये खरेदीसाठी रांगा लावल्याचे दिसून आले. मडगावचे उल्हास ज्वेलर्स या अस्थापनात लोकांची गर्दी दिसत होती.

या आस्थापनाचे विक्रम वेर्लेकर यांना विचारले असता, शेवटच्या दिवशी मिळालेला प्रतिसाद समाधानकारक होता असे त्यांनी सांगितले. चतुर्थीच्या सणामुळे गोव्याच्या बाजारपेठेत झालेली उलाढाल निश्चितच 100 कोटींच्या वर गेली असेल पण एरव्हीच्या काळात सणासुदीला ही उलाढाल 300 कोटींच्या वर जात होती ते पाहिल्यास हे प्रमाण कमी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कामाक्षी डिजिवर्ल्ड या चेन शोरूमचे मालक योगेश कुंकळयेकर म्हणाले, चतुर्थीच्या काळात लोकांनी कपडे आणि इतर गरजेच्या वस्तू खरेदी करण्यास काटकसर केली नसली तरी तुलनेने लक्झरी वस्तू असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंकडे त्यांनी पाठ फिरवली.

म्हापसा बाजारपेठेतही मोठा व्यवसाय

म्हापसा येथील अखिल गोवा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नारायण कारेकर म्हणाले, की चतुर्थीच्या काळात केवळ गेल्या दोन-तीन दिवसांतच म्हापसा बाजारपेठेला ग्राहकांचा समाधानकारक प्रतिसाद मिळाला. त्यापूर्वी ग्राहकवर्ग अभावानेच बाजारपेठेत येत होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना फार मोठी अर्थप्राप्ती झाली असे म्हणता येणार नाही. तरीसुद्धा सध्याच्या कोविडविषयक स्थिती पाहत हे समाधानकारक आहे. म्हापसा बाजारपेठेत साधारणत: दोन हजार व्यापारी आहेत, असे गृहीत धरून प्रत्येक व्यापाऱ्याची अथवा विक्रेत्याची चतुर्थीकाळातील प्रतिदिन उलाढाल दहा हजार गृहीत धरल्यास या बाजारपेठेची प्रतिदिन उलाढाल समारे दोन कोटी होते.

ऐन सणासुदीत ‘एटीएम’ रिकामे

राज्यात ऐन सणासुदीच्या दिवसात एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पैसे न घेता बाजारात जाणाऱ्या नागरिकांची एटीएममध्ये पैसेच मिळत नसल्यामुळे मोठी गोची होत आहे. पुढील पाच दिवस बॅंका बंद आहेत. उत्सवकाळात मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. त्यामुळे पैशाची गरज भासते. गेल्या आठवडाभरात खातेधारकांनी एटीएममधून पैसे काढले. बॅंकांकडून एटीएममध्ये पैसे जमा केले जात नसल्याने विविध भागांत एटीएममध्ये खडखडाट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT