Sanjivani Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory : सरकारने आम्हाला योग्य न्याय द्यावा; संजीवनी’चे कंत्राटी कामगारांचा रोजगार धोक्‍यात

कराराचे नूतनीकरण रोखले; २०-२२ वर्षे बजावलीय सेवा

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda : संजीवनी सहकारी साखर कारखान्यात गेल्‍या २२ वर्षांपासून कंत्राट पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येत असल्याने त्‍यांच्‍यात असंतोष पसरला आहे.कर्मचारी बाबू गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेली २० ते २२ वर्षे आम्‍ही कंत्राट पद्धतीवर संजीवनी साखर कारखान्‍यात कामाला होता.

दरवर्षी आमच्‍या कंत्राटी कराराचे नूतनीकरण व्‍हायचे. पण यंदा गेल्या महिन्यात संपलेल्‍या कराराचे अजून नूतनीकरण करण्‍यात आलेले नाही. आम्हाला कामावरून कमी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आम्ही ८० कामगार आहोत. आता आमचे वय झाल्याने सरकारी नोकरी आम्हाला मिळणार नाही. आम्‍ही खायचे काय?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषीमंत्री रवी नाईक, स्थानिक आमदार डॉ. गणेश गावकर यांची भेट घेऊन आम्‍ही आमच्‍या समस्‍या मांडल्या आहेत. दोन महिन्यांचा पगार अजून मिळालेला नाही. सरकारने आम्हाला योग्य न्याय द्यावा.

बाबू गवळी, कामगार

कंत्राटी कामगारांचा दोन महिन्यांचा राहिलेला पगार त्‍यांना दिला जाईल. त्यांचे कंत्राट जून महिन्यात संपले आहे. जोपर्यंत सरकारकडून आम्हाला ‘त्यांना कामावर घ्या’ असे लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत त्यांना कामावर घेणे शक्य नाही.

सत्तेज कामत, ‘संजीवनी’चे प्रशासक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT