Neelkanth Halarnakar
Neelkanth Halarnakar Dainik Gomantak
गोवा

शेतकऱ्यांना भरपाई द्यावी: हळर्णकर

दैनिक गोमन्तक

पणजी: पूरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (Farmers) लवकर भरपाई मिळावी. शेतकऱ्यांना भात पिकासाठी हमी भाव लवकर मिळावा, अशी‌ मागणी कोलवाळचे आमदार नीळकंठ हळर्णकर (Neelkanth Halarnakar) यांनी केली.

अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले, कोलवाळ येथे पोलीस ठाणे झाल्यानंतर गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे,गुन्ह्यांचे उकल होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस चांगले काम करत आहेत. कोलवाळ येथील कंपनीत कामगारांना ८ तास काम केल्यानंतर दुसरा कामगार आला नसल्यास त्या कामगाराला आणखीन ८ तास काम करवून घेतले जाते. कारखाना व बाष्पक खात्याच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीचा दरवाजाही पाहिलेला नसेल. मागील अनेक दिवसापासून राज्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आज झालेल्या विधानसभा अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. राज्यात मागील काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भपाई देण्यात यावी. मात्र दुसरीकडे प्रमोद सावंत सरकार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर निष्काळजीपणा करत आहे. त्याचबरोबर भात पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना महापूराचा फटका बसल्यामुळे त्यांना हमीभाव देण्यात यावा अशीही मागणी विधानसभेत सदस्यांकडून करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT