Neelkanth Halarnakar Dainik Gomantak
गोवा

शेतकऱ्यांना भरपाई द्यावी: हळर्णकर

अशी‌ मागणी कोलवाळचे आमदार नीळकंठ हळर्णकर (Neelkanth Halarnakar) यांनी केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: पूरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (Farmers) लवकर भरपाई मिळावी. शेतकऱ्यांना भात पिकासाठी हमी भाव लवकर मिळावा, अशी‌ मागणी कोलवाळचे आमदार नीळकंठ हळर्णकर (Neelkanth Halarnakar) यांनी केली.

अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले, कोलवाळ येथे पोलीस ठाणे झाल्यानंतर गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे,गुन्ह्यांचे उकल होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस चांगले काम करत आहेत. कोलवाळ येथील कंपनीत कामगारांना ८ तास काम केल्यानंतर दुसरा कामगार आला नसल्यास त्या कामगाराला आणखीन ८ तास काम करवून घेतले जाते. कारखाना व बाष्पक खात्याच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीचा दरवाजाही पाहिलेला नसेल. मागील अनेक दिवसापासून राज्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आज झालेल्या विधानसभा अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. राज्यात मागील काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भपाई देण्यात यावी. मात्र दुसरीकडे प्रमोद सावंत सरकार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर निष्काळजीपणा करत आहे. त्याचबरोबर भात पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना महापूराचा फटका बसल्यामुळे त्यांना हमीभाव देण्यात यावा अशीही मागणी विधानसभेत सदस्यांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT