Goa Shipyard
Goa Shipyard Dainik Gomantak
गोवा

गोवा शिपयार्डमध्ये नोकऱ्या मिळाव्यात!

दैनिक गोमन्तक

वास्को: येथील गोवा शिपयार्ड कंपनीमध्ये स्थानिकांना नोकरी दिली जात नसून, त्यांना मुद्दामहून डावलले जात असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी केला आहे.

वास्कोतील गोवा शिपयार्ड कंपनीत अंदाजे सातशेपेक्षा अधिक नोकऱ्या विविध विभागात असून, त्याची जाहिरात वृत्तपत्रात नुकतीच जाहीर केली होती. मात्र, या नोकऱ्या वास्कोबरोबर मुरगाव तालुक्यातील शिक्षित युवकांना संधी न देता इतर राज्यातील परप्रांतीयांना देण्याचे षडयंत्र गोवा शिपयार्डचे प्रशासन व कंपनीतील कामगार संघटना करीत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

राज्य सरकारला गृहीत धरून येथील युवकांना नोकरी न देता इतर राज्यातील युवकांना नोकरीची संधी देण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे गोवा शिपयार्ड कंपनीने गोव्यातील युवकांवर एकप्रकारे अन्याय केला आहे. जर गोवा शिपयार्ड कंपनीने गोव्यातील तसेच स्थानिक युवकांना नोकरीत प्राधान्य दिले नाही तर मुख्य रस्ता अडवून कंपनी विरोधात आंदोलन छेडणार असल्याचे नंदादीप राऊत यांनी सांगितले.

...तर रास्ता रोको

विद्यमान प्रशासन व कामगार संघटनांनी नोकऱ्या देताना दुजाभाव करण्याचे प्रयत्न चालवले आहेत, असे नगरसेवक दीपक नाईक यांनी सांगितले. गोव्यातील शिक्षित युवकांना राज्य सरकारच्या नोकऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. गोवा शिपयार्डने येथील स्थानिक युवकांना नोकरी देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा गोवा शिपयार्डसमोर रस्ता रोको करून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दीपक नाईक यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT