Tilari Dam  Dainik Gomantak
गोवा

Goa Water Issue: पाण्याचे शुक्लकाष्ठ संपता संपेना...

Goa Water Issue: तिळारीचा कालवा पूर्ववत नाहीच: पर्वरी, साळगावात पाण्यासाठी वणवण सुरूच

दैनिक गोमन्तक

Goa Water Issue: तिळारी धरणाच्या कालव्याच्या दुरुस्ती कामामुळे मध्यंतरी महिनाभर पर्वरी व साळगावमधील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड वणवण करावी लागली. अलीकडेच कालव्याची दुरुस्ती करून तिळारीचे पाणी गोव्याला सोडले, पण चार दिवसांतच पुन्हा महाराष्ट्राच्या बाजूने कालव्यास भगदाड पडल्याने पाणीपुरवठा पुन्हा बंद करण्यात आला.

त्यामुळे पर्वरी व साळगाववासीयांचे पाण्याचे शुक्लकाष्ठ सध्यातरी संपण्याचे नाव घेत नाही असेच दिसते.

महाराष्ट्राच्या हद्दीतील तिळारी धरणाच्या कालव्याला भगदाड पडून सुरू झालेली गळती दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा जलस्त्रोतमंत्र्यांनी केला होता, परंतु हा दावा फोल ठरला आहे. कालव्याच्या गळतीमुळे 31 डिसेंबरपासून पाणीपुरवठा बंद झाला आहे.

आता ही गळती थांबवून पर्वरी व साळगावमध्ये पाणी पोचण्यास स्थानिकांना बुधवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

‘हर घर जल’च्या केवळ बाताच

सरकार तसेच मंत्री ‘हर घर जल’च्या फक्त बाताच मारतात. एकीकडे मंत्र्यांनी पाणी पूर्ववत केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात पर्वरीला सोमवारी पाणीपुरवठा झाला नाही. मी स्वत: तेथील प्रकल्पस्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर प्रकल्पात एक थेंबही पाणी नसल्याचे वास्तव्य लक्षात आले, अशी माहिती आल्त-तोरडामधील स्थानिकाने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

Renuka Devi History: देव-असुरांमध्ये युद्ध चालू होते, श्रीविष्णूंनी वचन दिले की आदितीच्या गर्भातून जन्म घेतील; रेणुका मातेचा इतिहास

SCROLL FOR NEXT