Banana Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: गोव्यात केळींचे 29531 टन उत्पादन! 2495 हेक्टर जमीन लागवडीखाली; सत्तरी, केपेत अधिक उत्पादन

Goa Banana Production: राज्यात मोठ्या प्रमाणात सालदाटी, वेलची, भाजीची केळी तसेच आता केरळी केळ्यांचे उत्पादन घेण्यात येते; परंतु प्रामुख्याने सालदाटी आणि वेलची केळ्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: केळी हे बारामाही येणारे पीक आहे. त्यासोबतच आंतरपिकात तसेच बागायतींमध्ये लागवडीसाठी अतिशय योग्य असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेण्यात येते. केळी हे पारंपरिक तसेच मोठ्या प्रमाणात मागणी असणारे हे पीक असल्याने राज्यातील २,४९५ हेक्टर जमीन केळी लागवडीखाली असून २९,५३१ टन उत्पादन वर्षाला घेण्यात येत असल्याची माहिती कृषी संचालनालयाने दिली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात सालदाटी, वेलची, भाजीची केळी तसेच आता केरळी केळ्यांचे उत्पादन घेण्यात येते; परंतु प्रामुख्याने सालदाटी आणि वेलची केळ्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. सत्तरी आणि केपे तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते.

राज्यात सर्वाधिक ५२८ हेक्टर क्षेत्रफळात केळीची लागवड ही केपे तालुक्यात होत असून येथे एकूण ५,८५७ टन इतके केळ्यांचे उत्पादन घेण्यात येते, तर सर्वात कमी २५ हेक्टर क्षेत्रफळात लागवड ही मुरगाव तालुक्यात केली जात असून येथे केवळ ३२६ टन इतके उत्पादन घेण्यात येते.

केळी लागवड व उत्पादन

उत्तर गोवा

क्षेत्रफळ - ९९२ हेक्टर

उत्पादन - ११,९८२ टन

दक्षिण गोवा

क्षेत्रफळ - १,५०३ हेक्टर

उत्पादन -१७,५४९ टन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

शिक्षकच आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालतात तेव्हा... सरकारी शाळांच्या विश्वासार्हतेचे काय?

Crime News: बायकोची हत्या करुन मृतदेह पंख्याला टांगला, प्रेमविवाहाचा 'रक्तरंजित' शेवट; मित्राच्या मदतीनं नवऱ्यानं काढला काटा

बिहारचा बाहुबली ते दिल्लीचा दरबारी; नितीन नवीन यांच्या संघटनात्मक कौशल्याची आता राष्ट्रीय कसोटी- संपादकीय

SCROLL FOR NEXT