Death number of corona patients in Goa crossed 700 
गोवा

गोव्यातला कोरोना बळींचा आकडा ७०१ वर

गोमन्तक

पणजी :  राज्यात आज तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यात आजवर झालेल्या कोरोना बळींची संख्या संख्या ७०१ इतकी झाली आहे, दरम्यान आज ९० लोकांना कोरोनाची लागण झाली, तर १५४ लोक कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. आज मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील रिकव्हरी रेट ९५.९० टक्के इतका आहे. राज्यभरात १२९७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज १०२ लोकांनी होम आयसोलेशनचा मार्ग उपचारासाठी स्वीकारला, तर इस्पितळात उपचार करण्यासाठी ४१ लोकांना भरती करून घेण्यात आले. पंधराशे पंच्याहत्तर कोरोना पडताळणी चाचण्या करण्यात आल्या.


आज ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यामध्ये ७८ वर्षीय पुरुष, हळदोणे येथील ७१ वर्षीय पुरुष आणि माजोर्डा येथील ७६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यातील दोन मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणि एक मृत्यू इएसआय इस्पितळात झाला आहे. 
राज्यातील उत्तर गोव्यातील कोरोना केअर सेंटरची क्षमता २७५ खाटांची आहे. यातील २४५ खाटा सध्या रिकाम्या आहेत, तर दक्षिण गोव्यातील कोरोना केअर सेंटरची क्षमता ६० असून यातील ४६ खाटा रिकाम्या आहेत. सरकारकडे लोकांच्या उपचारासाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.  


राज्यातील कोरोनाचे रुग्ण

  • पर्वरी - ८९, मडगाव - ११७, 
  • फोंडा - ६८,  वास्को - ६३, 
  • लोटली - ४७ पणजी - ७८, 
  • चिंबल - ५३

अधिक वाचा :

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT