Congress means part-time party says BJP leader Devendra Fadanvis

 

Dainik Gomantak 

गोवा

कॉंग्रेस म्हणजे 'पार्टटाईम पार्टी', देवेंद्र फडणवीसांची टीका

कॉंग्रेस हा पार्टटाईम पक्ष झाला आहे. गोवा स्वाभीमानी आहे. गोव्यातील मतदार आम आदमी पक्षाच्या भूलथापांना कधीच बळी पडणार नाही.

दैनिक गोमन्तक

देशात आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. यातच गोवा विधानसभा निवडणूकीची (Goa Assembly Election) तयारीही राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. याच पाश्वभूमीवर गोवा भाजपचे प्रभारी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी गोव्यामध्ये बोलत असताना कॉंग्रेससह तृणमुल कॉंग्रेस (Trinamool Congress) आणि आम आदमी पक्षावर हल्ला चढवला.

फडणवीस म्हणाले, कॉंग्रेस (Goa Congress) हा पार्टटाईम पक्ष बनला आहे. गोवा स्वाभीमानी आहे. गोव्यातील मतदार आम आदमी पक्षाच्या भूलथापांना कधीच बळी पडणार नाही. रोहण खवंटे यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गोव्याची विधानसभा निवडणूक तर आपण जिंकणार आहोत.

दरम्यान, रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांनी पक्ष प्रवेशानंतर मनोगत व्यक्त करताना सर्वांचे आभार मानले. "पर्वरी मतदारसंघात मागील दहा वर्ष मी अपक्ष आदार म्हणून निवडून आलो ते फक्त तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळेच. अडीच वर्षे मंत्री असताना गोवेकरांसाठी काम केले. एक सुध्दा मध्यमवर्गीय कुटुंबातील असून कष्टाची किंमत काय असते हे मला चांगले माहीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवी दीर्घायुष्याचे रहस्य समुद्राच्या तळाशी? व्हेल माशांमधील 'या' प्रथिनामुळे माणूस जगू शकणार 200 वर्षे! संशोधनातून खुलासा

मुंबई इंडियन्समध्ये मोठा फेरबदल? हार्दिकची कॅप्टन्सी धोक्यात, आता सूर्या नव्हे तर तिलक वर्माकडे संघाची धुरा!

Goa Govt Jobs: गोव्यात 709 पदांची मेगा भरती! 16 मेपासून सीबीटी परीक्षा; पोलिस खात्यात 596 जागा

New Gas Connection: महिनाभरात 11 हजार नव्या 'गॅस जोडण्या', बेकायदा सिलिंडरला बसला चाप

Maratha History: रायगड ते जिंजी: छत्रपती शिवरायांनी कशी उभारली स्वराज्याची दक्षिण फळी?

SCROLL FOR NEXT