Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : ..तर अधिक शिक्षक देऊन शाळा चालवू!

आपच्या मागणीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा पलटवार; विद्यार्थी हितालाच प्राधान्य देत असल्याचा दावा

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant : शासकीय प्राथमिक शाळांच्या विलिनीकरणाच्या निर्णयावर नागरिकांचा विरोध आहे. विरोधी पक्षांनीही यावरून टीकेची झोड उठविली आहे. यावर ‘ज्या सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थीसंख्या कमी आहे, तेथील पालक तयार असतील तर तेथे अधिक शिक्षक देऊन त्या शाळा चालवण्यास सरकार तयार आहे’, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी स्पष्ट केले.

‘प्राथमिक शाळा बंद करू असे आतापर्यंत आपण कधीच म्हटलो नाही. दोन-तीन विद्यार्थी असलेल्या शाळांचे जवळच्या शाळांत विलिनीकरण करून तेथील शिक्षकांची संख्या वाढवणे, नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्था पुरवणे आणि एकंदरीत सरकारी प्राथमिक शाळांच्या व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने सरकारने शाळा विलिनीकरणासंदर्भात सर्वेक्षण करून शिक्षक, पालकांशी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे’, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

सरकारला शाळांच्या इमारतींची नव्हे, तर विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षणाची चिंता आहे. त्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचा पाया बळकट करण्याचे सरकारचे ध्येय आहे. त्यासाठीच चाचपणी सुरू आहे. परंतु, काही राजकीय पक्षांनी यावरून प्रसिद्धी मिळवण्याचा खटाटोप सुरू केला आहे, असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT