Climate Change Dainik Gomantak
गोवा

खराब हवामानाचा गोव्यातील काजू पीक आणि किनारपट्टीवर परिणाम; पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली मोठी भीती

गोवा राज्य हवामान बदलाच्या कृती आराखड्यानुसार, पूर आणि इतर कारणांमुळे गोव्याची 15% जमीन नष्ट होईल.

Pramod Yadav

Climate Change Impact On Cashew And Beach In Goa: खराब हवामानाचा परिणाम गोव्यातील काजू पिकावर झाला आहे. तसेच, गोव्याच्या किनारपट्टीला देखील धूप होण्याच्या धोका निर्माण झाला आहे.

हवामान बदलाचा परिणाम गोव्यात सहज दिसून येतोय, यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने प्राधान्य द्यावे, अन्यथा राज्याचे आर्थिक नुकसान होईल, असे मत पर्यावरणवादी अभिजित प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले आहे.

गोवा राज्य हवामान बदलाच्या कृती आराखड्यानुसार, पूर आणि इतर कारणांमुळे गोव्याची 15% जमीन नष्ट होईल. गोव्याने जमीन गमावली तर त्याचा पर्यटनावरही परिणाम होईल, कारण समुद्रकिनारे पाण्यात जातील. ज्या पर्यटन क्षेत्रांवर आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे ते आपण गमावू, असेही प्रभुदेसाई म्हणाले.

अर्थव्यवस्था कोलमडली तर आपण काय करणार? 15 टक्के जमीन गमावल्यास किनारपट्टीच्या राज्याचे मोठे नुकसान होईल. समुद्र पातळी वाढल्याने किनारपट्टीची धूप होईल. संपूर्ण किनारी भाग प्रभावित होईल.

हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर देखील परिणाम होत आहे, त्यामुळे सरकारने अर्थसंकल्पात जास्तीत जास्त तरतुदी करून हे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण न केल्यास पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागू शकते.

हवामान बदलाचा परिणाम फळांच्या पॅटर्नवरही झाला असल्याचे त्यांनी सांगितले. हवामानातील बदलामुळे काजू उत्पादन आणि इतर कामांवर परिणाम झाल्याचे अनेक शेतकरी सांगतात. हवामान अनुकूल नसल्याने मासे प्रजननासाठी इतर ठिकाणी जात असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे, असे प्रभुदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: फिन ॲलनचं वादळ! दिल्लीच्या गोलंदाजांची दाणादाण उडवत ठोकलं शतक; केकेआरच्या 'सिक्सर किंग' क्लबमध्ये मारली धडक

खरी कुजबुज: सामान्यांची सरकारला कदर नाही का?

West Bengal Victory: सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू सरकार; तामिळनाडूत विजय सत्तेच्या जवळ

Goa Crime Highest: महिलांवरील अत्याचारात 'गोवा' अव्वल; पोलिसांकडून खंडन; ‘एनसीआरबी’च्‍या अहवालाने राज्‍यभर खळबळ

New CDS Of India: भारताला मिळाले नवीन सीडीएस! लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणि यांची नियुक्ती; जनरल अनिल चौहान यांच्यानंतर सांभाळणार तिन्ही दलांची धुरा

SCROLL FOR NEXT