Climate Change Dainik Gomantak
गोवा

खराब हवामानाचा गोव्यातील काजू पीक आणि किनारपट्टीवर परिणाम; पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली मोठी भीती

गोवा राज्य हवामान बदलाच्या कृती आराखड्यानुसार, पूर आणि इतर कारणांमुळे गोव्याची 15% जमीन नष्ट होईल.

Pramod Yadav

Climate Change Impact On Cashew And Beach In Goa: खराब हवामानाचा परिणाम गोव्यातील काजू पिकावर झाला आहे. तसेच, गोव्याच्या किनारपट्टीला देखील धूप होण्याच्या धोका निर्माण झाला आहे.

हवामान बदलाचा परिणाम गोव्यात सहज दिसून येतोय, यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने प्राधान्य द्यावे, अन्यथा राज्याचे आर्थिक नुकसान होईल, असे मत पर्यावरणवादी अभिजित प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले आहे.

गोवा राज्य हवामान बदलाच्या कृती आराखड्यानुसार, पूर आणि इतर कारणांमुळे गोव्याची 15% जमीन नष्ट होईल. गोव्याने जमीन गमावली तर त्याचा पर्यटनावरही परिणाम होईल, कारण समुद्रकिनारे पाण्यात जातील. ज्या पर्यटन क्षेत्रांवर आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे ते आपण गमावू, असेही प्रभुदेसाई म्हणाले.

अर्थव्यवस्था कोलमडली तर आपण काय करणार? 15 टक्के जमीन गमावल्यास किनारपट्टीच्या राज्याचे मोठे नुकसान होईल. समुद्र पातळी वाढल्याने किनारपट्टीची धूप होईल. संपूर्ण किनारी भाग प्रभावित होईल.

हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर देखील परिणाम होत आहे, त्यामुळे सरकारने अर्थसंकल्पात जास्तीत जास्त तरतुदी करून हे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण न केल्यास पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागू शकते.

हवामान बदलाचा परिणाम फळांच्या पॅटर्नवरही झाला असल्याचे त्यांनी सांगितले. हवामानातील बदलामुळे काजू उत्पादन आणि इतर कामांवर परिणाम झाल्याचे अनेक शेतकरी सांगतात. हवामान अनुकूल नसल्याने मासे प्रजननासाठी इतर ठिकाणी जात असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे, असे प्रभुदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT