पेळावदा रावण येथे खचलेला पुलाचा रस्ता Dainik Gomantak
गोवा

Goa: पेळावदा रावण येथील रस्ता खचल्याने गावाचा संपर्क तुटला

पेळावदा रावण येथील नवीन पुलांची मागणी होती पण गोवा सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे.

दैनिक गोमन्तक

पर्ये: सत्तरीतील केरी ग्रामपंचायत क्षेत्रातील पेळावदा रावण येथील सावंतवाडा (sawantwada at pelavada ravan of sattari taluka ) इथल्या पुलाचा रस्ता खचल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे त्यामुळे इथल्या गावाचा संपर्क तुटला आहे. आज पहाटे या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या नाल्याला मोठे पाणी आल्याने हा पूल खचला. (Bridge at sawantwadi bicholim area pavada ravan was collapse)

पेळावदा रावण येथे खचलेला पुलाचा रस्ता

सावंतवाडा येथील नाल्यावर हा सिमेंटच्या पाईपवर पूल उभारला होता. या पावसाच्या पाण्याने पुलाखालील माती वाहून गेल्याने हा रस्ता खचला गेला. खचलेल्या पुलाच्या भोकातून पाणी वाहत असून रस्त्याचा दर्शनी भाग पूर्णपणे कमकुवत झाल्याने पूर्ण रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षतेच्या कारणामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यापूर्वी हा पूल काही प्रमाणात खचला होता, त्यावेळी त्यात दगड टाकून त्याची तात्पुरती दुरुस्ती केली होती. पण यावेळेस हा मोठ्या प्रमाणात खचल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्याने नागरिकांचा संपर्क सुटला आहे. दरम्यान या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून नवीन पुलांची मागणी होती पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT