Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Panaji News : भाजप एकमेव संकल्प पूर्ण करणारा पक्ष : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, भाजपने यापूर्वीच दोन्ही निवडणुकीत संकल्पत्रात दिलेली ९० टक्के आश्वासने पूर्ण केली आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करणारा भाजप हाच एकमेव पक्ष असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज नागपूरमध्ये दावा केला.

भाजपने जाहीर केलेल्या संकल्पत्राची माहिती देण्यासाठी ते आज नागपूरमध्ये आले होते. भाजपच्या संकल्पपत्र जाहीर होताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी फेकू जाहीरनामा असे म्हटले, तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी जुमलापत्र असे संबोधले होते. याकडे लक्ष वेधले असता सावंत यांनी मोदी सरकार यावेळी चारशे पार करणार असल्याने खर्गे यांच्या काँग्रेसला नोकरीतील रिक्त जागा भरण्याची संधी मिळणार नसल्याचा टोला लागावला.

भाजपला चारशे पार करण्यासाठी यावेळी दक्षिण भारतातून मोठी मदत होणार आहे. केरळमध्येही यावेळी भाजपचे खाते उघडणार आहे. महाराष्ट्रात महायुतील चाळीसपेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. ‘अबकी बार गोळीबार सरकार'' या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, त्या कौटुंबिक भांडणे आणि मतभेदांमुळे असे बोलत असाव्या, असे ते म्हणाले.

खर्गेंचा नोंदवला निषेध

भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलतील अशी भीती जनतेला दाखवणाऱ्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या वक्तव्याचा सावंत यांनी यावेळी निषेध नोंदवला.

निवडणूक पूर्व सर्वेत महायुतीला अत्यल्प जागा दाखवण्यात येत आहे, अशी विचारणा केली असता ते सर्वे कसे आणि कोण करतात हे ठावूक नाही, असे ते म्हणाले. निवडणुकीच्या काळात रोज परिस्थिती बदलत असते. आज वाटणारे अंदाज उद्या बदलतात, असेही सावंत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT