डिचोली: डिचोलीतील आमठाणे धरणाचे दुरुस्ती काम पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. दुरुस्तीकाम पूर्ण कधी होणार, याची प्रतीक्षा सुरू आहे. दुसरीकडे समाधानाची बाब म्हणजे धरणात आता जलसाठा होऊ लागला आहे.
दुरुस्तीसाठी दोन महिन्यांपूर्वी या धरणातील जलसाठा कमी करण्यात आला होता. जुलै महिन्यात पातळी जेमतेम पाच मीटर इतकी राहिली होती आणि पात्र कोरडे पडले होते. गेल्या आठ-दहा दिवसांच्या पावसामुळे पाण्याची पातळी मंगळवारी (ता. २) जवळपास ४५ मीटरवर पोहोचली आहे.
जानेवारीत तिळारी कालव्याला भगदाड पडून ‘पाणीबाणी’ निर्माण झाली होती. ती स्थिती टाळण्यासाठी धरणावर दुरुस्ती करून स्वयंचलीत गेट बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र सध्याच्या गतीनुसार हे काम पूर्ण होण्यासाठी अजून किमान आठ ते दहा दिवस लागतील.
गेल्या जुलै अखेरपर्यंत दुरुस्तीकाम पूर्ण करण्याचे जलसंपदा खात्याचे नियोजन होते. १४ जुलैला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी धरणाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला होता व ते वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला होता.
जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनीही तसेच सांगितले होते. मात्र जुलै अखेर उलटून गेला. त्यानंतर ‘चार-पाच दिवसांत काम पूर्ण होईल’ असे आश्वासन दिले गेले. तरीही धरणावरील दुरुस्तीकाम अद्याप सुरूच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.