राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात कुठे दरडी कोसळल्या तर कुठे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले. पावसामुळे आतापर्यंत राज्यात मोठी वित्तहानी झाली आहे.
दरम्यान, संपूर्ण बार्देश तालुक्यासह डिचोलीतील काही भागात पाणी पुरवठा करणाऱ्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात बिघाड निर्माण झाल्याने आज (शनिवारी) सकाळपासून पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
प्रकल्पात बिघाड झाल्याने ही समस्या उद्भवली असून, उद्यापर्यंत बार्देशसह डिचोलीत मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसे परिपत्रक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाने जारी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जलशुद्धीकरण प्रकल्पाला जोडणाऱ्या वीज ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.