Dams in Goa  Dainik Gomantak
गोवा

राज्यातील सातही धरणे पूर्ण क्षमतेने भरली

पावसाचा जोर वाढल्यास धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवावा लागणार

दैनिक गोमन्तक

गोवेकरांना पाणीपुरवठा करणारी सात ही धरणे भरली आहेत. याबाबत जलसंपदा विभागाने दिली आहे. यामूळे राज्यातील यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यामूळे राज्याला ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अभाव न जाणवता योग्य नियोजनाने गोवेकरांना पाण्याचा गारवा कायम राहणार आहे.

(All seven dams in Goa state were filled to capacity )

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील पाणीपुरवठा करणारी सातही धरणे भरली असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. यापैकी साळवली धरण 103.5 टक्के भरले आहे, तर अंजुणे धरण 94.6 टक्के भरले आहे. यानंतर राज्यात पावसाचा तडाका कायम राहिल्यास पाणी आणखी वाढू शकते. ज्याच्यामूळे धरणातून पाण्याचा प्रवाह वाढवावा लागणार आहे. असे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी सांगितले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसात आतापर्यंत 8.4 टक्के घट झाली असली तरी राज्यातील धरणे भरून वाहत आहेत. यावर्षी आतापर्यंत 101.57 टक्के पाऊस अपेक्षित होता. मात्र,केवळ 93.2 टक्केच पाऊस झाला आहे. पावसाळ्याला अजून दीड महिना बाकी आहे. या काळात पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाणी सोडावे लागणार आहे.

साळवली आणि अंजुणे धरणांच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात शेतीसाठी तसेच पिण्यासाठी केला जातो. ही दोन्ही धरणे ओसंडून वाहत असल्याने भविष्यात पाण्याची कमतरता भासणार नाही. यासाठी जलसंपदा विभागाकडून धरणाच्या पाण्याची पातळी दररोज मोजली जाते. यामूळे राज्यातील पाणी पातळीवर कायम लक्ष असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'प्रमोद सावंतांमध्ये रोखण्याची हिम्मत नाही', जमिनीचा मालकी हक्क देण्याचा केजरीवालांनी 'मये'वासीयांना केला वायदा

Goa Crime: सुर्ला येथे फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

Rohit Sharma Captaincy: "आम्हाला युवा खेळाडूंना संधी द्यायचीय", रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढलं? अजित आगरकरांनी सांगितलं खरं कारण

'अमित पाटकरांची खाण प्रमोद सावंतांच्या आशिर्वादाने सुरुये, दोघेही गोमंतकीयांना मूर्ख बनवतायेत'; अरविंद केजरीवाल

रश्मीका-विजयने गुपचूप उरकला साखरपूडा; दोन महिन्यात होणार 'शुभमंगल सावधान'!

SCROLL FOR NEXT