Valmiki Naik Aam Aadmi Party Dainik Gomantak
गोवा

खराब रस्त्यांमागे भ्रष्टाचार हेच कारण : आप

रस्त्यांवरील खड्डे आणि अटल सेतूवरील खराब झालेल्या रस्त्यावरुन आम आदमी पार्टी आक्रमक

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील रस्त्यांवरील खड्डे आणि अटल सेतू पुलावरील खराब झालेला रस्ता हे भ्रष्टाचाराचे मुख्य कारण असल्याची टिका आम आदमी पक्षाने केली आहे. पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत वाल्मिकी नाईक, सेसिल रॉड्रिगीस, सुनील शिंगणापूरकर उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याने राज्यात रस्ते दुरुस्तीचे काम रेंगाळलेले आहे. अटल सेतूवरील कामासाठी निकृष्ट दर्जाचे वापरले आहे. त्यामुळेच सातत्याने खड्डे पडत आहेत. या कामासाठी मद्रास आयआयटीकडून चाचणी करून घेण्यात येणार आहे. मात्र, मुळातच हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणीही पत्रकार परिषदेत वाल्मिकी नाईक यांच्याकडून करण्यात आली.

राज्यातील मुख्य रस्ते, शहरांना जोडणारे आणि गावातील रस्ते वर्षानुवर्षे खड्ड्यांनी भरलेले आहेत. गेल्या चार वर्षांत सातत्याने खड्डे बुजवल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे. बुजवलेले खड्डे आठ ते पंधरा दिवसांत पुन्हा डोके वर काढत आहेत. सरकारने जनतेच्या डोळ्यात चालवलेली ही धूळफेक आहे. सरकारने उत्तम दर्जाचे साहित्य वापरून पक्के रस्ते निर्माण करावेत, अशी मागणी सेसिल रॉड्रिगीस यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT