India vs South Africa T20 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड VIDEO

India vs South Africa T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना क्रिकेटच्या इतिहासात एका वेगळ्या कारणाने नोंदवला गेला.

Manish Jadhav

India vs South Africa 4th T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना क्रिकेटच्या इतिहासात एका वेगळ्या कारणाने नोंदवला गेला. लखनौच्या इकाना स्टेडियमवर रंगणारा हा महत्त्वाचा सामना दाट धुक्यामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. क्रिकेटच्या प्रदीर्घ इतिहासात धुक्यामुळे आंतरराष्ट्रीय टी-20 सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मात्र, सामना रद्द झाल्यामुळे मैदानात आलेल्या हजारो चाहत्यांचा हिरमोड झाला असून सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियोजनावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

निसर्गाचा अडथळा आणि पंचांची परीक्षा

लखनौमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका आणि धुक्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी (17 डिसेंबर) संध्याकाळी इकाना स्टेडियमवर टॉसच्या वेळी परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, एका स्टँडमधून दुसऱ्या स्टँडमधील प्रेक्षक किंवा खेळाडू दिसणेही कठीण झाले होते. निर्धारित वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता नाणेफेक होणे अपेक्षित होते, परंतु खराब दृश्यमानतेमुळे (Visibility) पंचांनी खेळ थांबवून ठेवण्याचा निर्णय घेतला.

मैदानातील परिस्थिती सुधारण्याची आशा बाळगून पंचांनी तब्बल तीन तास प्रतीक्षा केली. या दरम्यान, एकूण 6 वेळा खेळपट्टी आणि मैदानाचा आढावा (Inspection) घेण्यात आला. प्रत्येक वेळी पंचांना धुक्याचे प्रमाण वाढत असल्याचेच दिसून आले. अखेरीस रात्री 9:30 च्या सुमारास खेळाडूंना दुखापत होण्याचा धोका आणि चेंडू न दिसण्याची शक्यता लक्षात घेऊन पंचांनी सामना रद्द करण्याची अधिकृत घोषणा केली.

"तीन पोती गहू विकून आलो होतो..."

सामना रद्द झाल्याची घोषणा होताच स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांच्या संयमाचा बांध फुटला. अनेक जण लांबून हा सामना पाहण्यासाठी आले होते. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एका चाहत्याने आपली व्यथा मांडली, जी सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरली आहे. हा चाहता भावूक होऊन म्हणाला, "मी घरची तीन पोती गहू विकून आजच्या सामन्यासाठी तिकिटाचे पैसे जमा केले होते. मोठ्या आशेने मी इथपर्यंत आलो, पण मला एकही चेंडू पाहायला मिळाला नाही. आता मला माझे पैसे परत हवे आहेत."

या चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बीसीसीआयवर टीकेची झोड उठली आहे. उत्तर भारतात या मोसमात धुक्याचे प्रमाण जास्त असते, हे माहीत असूनही लखनौमध्ये डे-नाईट सामना का आयोजित केला गेला? असा सवाल चाहते विचारत आहेत. चाहत्यांच्या तिकिटाचे पैसे परत मिळावेत, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

मालिकेत भारताची अजेय आघाडी

चौथा सामना रद्द झाल्याचा तांत्रिक फायदा भारतीय संघाला (Team India) मिळाला आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियाने आता 2-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे. मालिकेची सुरुवात भारताने धमाकेदार विजयाने केली होती, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन केले होते. मात्र, धर्मशाला येथे झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केले होते.

आता या मालिकेचा निकाल पाचव्या आणि अंतिम सामन्यावर अवलंबून असेल. जर भारताने शेवटचा सामना जिंकला किंवा तोही पावसामुळे/हवामानामुळे रद्द झाला, तर भारत मालिका जिंकेल. मात्र, दक्षिण आफ्रिकेने शेवटचा सामना जिंकल्यास मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटेल.

पुढील रणसंग्राम अहमदाबादमध्ये

या मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना आता 19 डिसेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अहमदाबादमध्ये लखनौसारखी धुक्याची समस्या नसावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय संघ शेवटचा सामना जिंकून मालिका आपल्या नावे करण्यासाठी सज्ज आहे, तर दक्षिण आफ्रिका मालिका वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy 2025: ईशान किशनचं वादळ अन् झारखंडचा ऐतिहासिक विजय; फायनलमध्ये हरियाणाचा धुव्वा उडवत पटकावलं विजेतेपद! VIDEO

Goa Robbery Incident: गेस्ट हाऊसमध्ये घुसून जर्मन पर्यटकाची लूट, 18 वर्षाच्या भामट्याला बेळगावात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

SCROLL FOR NEXT