Delhi CM and AAP Chief Arvind Kejriwal was in Goa on Monday ahead of Assembly Elections  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Arvind Kejriwal: गोव्यात सरकार आलं तर मोफत तीर्थयात्रेसह मोफत दर्शन देणार

आम्ही गोव्यात (Goa) सरकार स्थापन केले तर आम्ही हिंदूंसाठी अयोध्येला (Ayodhya) आणि ख्रिश्चन लोकांसाठी वालंकिणी (Velankanni) मोफत तीर्थयात्रा आयोजित करणार, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे गोव्यातील नागरिकांना वचन

दैनिक गोमन्तक

जर गोव्यात (Goa) आपची (Aam Aadmi Party) सत्ता आली तर आमचे सरकार हिंदूंसाठी अयोध्येला (Ayodhya) आणि ख्रिश्चनांसाठी वालंकिणी मोफत तीर्थयातत्रेच आयोजन करेल तसेच मुस्लिमांनासाठी आम्ही अजमेर शरीफ (Ajmer Sharif) साठी तर साई भक्तांना शिर्डीला मोफत दर्शन यात्रा देऊ असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गोव्यात दिले आहे.

आगामी विधनसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल सध्या गोवा दौऱ्यावर आहेत.

भारतात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. देशातील सर्वच राजकीय पक्षांनी याची जय्यत तैयारी देखील सुरु केल्याचे दिसते. यात गोव्याचा देखील समावेश आहे.

भारतात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. देशातील सर्वच राजकीय पक्षांनी याची जय्यत तैयारी देखील सुरु केल्याचे दिसते. यात गोव्याचा देखील समावेश आहे. आम आदमी पक्षाने देखील प्रचाराची तैयारी सुरु केली असून पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे गोव्यात होते. पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी भाजपला तसेच काँग्रेसवर सडकून टीका केली. "भाजप-काँग्रेस दोघेही वाटून मलई खातात. काँग्रेसची सत्ता असताना भाजपने काँग्रेस भ्रष्ट असल्याचे सांगितले. तेव्हापासून भाजपने काँग्रेसच्या एकाही नेत्याला तुरुंगात कसे पाठवले नाही? दोघांनीही एकमेकांवर कारवाई न करण्याचे मान्य केले आहे," असं केजरीवाल म्हणाले.

रविवारी ट्विट केल्याप्रमाणे आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सोमवारी ‘भावनिक’ गुगली टाकली. राज्यात सरकार आल्यास हिंदुंना शिर्डी-अयोध्या, ख्रिश्‍चनाना वालंकिणी आणि मुस्लिमांना अजमेर शरिफच्या सहलीची आॅफर त्यांनी दिली. यापूर्वी त्यांनी मोफत वीज पुरवठा आणि रोजगाराच्या हमीची घोषणा केली होती.

राज्य सरकारने यापूर्वी राज्यातील लोकांसाठी धार्मिक स्थळांच्या सहलीची योजना घोषीत केली होती, मात्र ती फोल ठरली आहे. दिल्लीत ज्या सामान्यांना त्यांच्या इच्छीत धार्मिक स्थळांना भेट देण्याचे भाग्य मिळत नाही, त्यांच्यासाठी सरकारकडून विशेष सहलीची सोय करण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. गोव्यातील जनतेलाही अशा सहलीसाठी विशेष अनुदान देऊ, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. एकंदर केजरीवाल यांनीही ‘भावनिक गेम’ खेळला आहे.

भ्रष्‍टाचार्‍यांना तुरूंगात डांबू

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभिर आरोप केले आहेत. तरीही पक्ष त्याबाबत गंभिर नसल्याबाबत केजरीवाल यांनी खेद व्यक्त केला. राज्यातीत भ्रष्ट मुख्यमंत्री बदलण्याऐवजी केंद्र सरकारने त्यावेळी राज्यपालच बदलला. पण, सत्य अधिक काळ लपून राहत नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर मात्र भ्रष्टाचार्‍यांना तुरूंगात डांबू, असे केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवरही सडकून टीका करतांंना तेही भाजपशी मिळून भ्रष्टाचार करीत असल्‍याचा आरोप त्यांंनी केला.

दिदी माझ्याबद्दल असे बोलणार नाहीत

प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी तुमच्यावर टीका केली आहे असे सांगितले असता, केजरीवाल यांनी ‘दिदी माझ्याबद्दल असे बोलणे शक्यच नाही’ अशी कोटी केली. त्यांच्‍या या बोलण्यातून आगामी निवडणुकीतील अनेक गुंतागुतीवरून पडदा उघडला गेला आहे. राज्यात ४० टक्के महिलांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT Project Farmagudi: फर्मागुढी 'आयआयटी'ला विरोधासाठी विरोध नको! देवस्थानला धक्का लागणार नाही;CM प्रमोद सावंताचे स्पष्टीकरण

Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

Horoscope: महिन्याच्या शेवटच्या दिवशी 'या' 4 राशींचे नशीब चमकणार; करिअर, व्यवसायात मोठ्या यशाचे संकेत

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

SCROLL FOR NEXT