Shehbaz Sharif Dainik Gomamntak
ग्लोबल

भारतासोबत 'कायम शांतता' हवी, युद्ध हा पर्याय नाही: Shehbaz Sharif

पाकिस्तानला भारतासोबत चर्चेद्वारे “शाश्वत शांतता” हवी आहे आणि काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा पर्याय नाही.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी म्हटले की, त्यांच्या देशाला भारतासोबत चर्चेद्वारे “शाश्वत शांतता” हवी आहे आणि काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा पर्याय नाही. वृत्तानुसार, हार्वर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका गटाला संबोधित करताना शाहबाज शरीफ म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार काश्मीर समस्येचे निराकरण या प्रदेशात कायमस्वरूपी शांततेशी निगडीत आहे. (We want permanent peace with India war is not an option Shehbaz Sharif)

पंतप्रधान शरीफ शुक्रवारी संध्याकाळी म्हणाले की, "पाकिस्तान, भागामध्ये शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहे." ते म्हणाले की, 'आम्हाला चर्चेद्वारे भारतासोबत कायमस्वरूपी शांतता हवी आहे कारण युद्ध हा कोणत्याही देशासाठी पर्याय नाहीये.' खरं तर काश्मीर प्रश्न आणि सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अनेकदा ताणले गेले आहेत.

5 ऑगस्ट 2019 रोजी, भारताने घटनेच्या कलम 370 मधील बहुतेक तरतुदी रद्द केल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर, 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले होते.

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायमच राहील, असे भारताने वारंवार सांगितले आहे. दहशतवाद, अस्थिरता आणि हिंसाचारापासून मुक्त वातावरणात पाकिस्तानशी सामान्य शेजारी संबंध हवे आहेत, असे भारताचे कायमच म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शरीफ म्हणाले की, पाकिस्तान आणि भारताने व्यापार, अर्थव्यवस्था आणि त्यांच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी स्पर्धा करायला हवी. ते म्हणाले की, पाकिस्तान आक्रमक नाही, पण त्यांची अण्वस्त्रे आणि प्रशिक्षित लष्कर हेच प्रतिबंधक आहेत. पुढे ते म्हणाले की, पाकिस्तान आपल्या सीमांच्या रक्षणासाठी लष्करावर खर्च करतो आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT