Sri Lanka Crisis
Sri Lanka Crisis Dainik gomantak
ग्लोबल

Sri Lanka Crisis: 30 लाख लोकांची भूक भागवण्यासाठी 500 कोटी रुपये आवश्यकता

गोमन्तक डिजिटल टीम

Sri Lanka: श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे हाहाकार माजला आहे. महागाई एवढी वाढली आहे की लोकांच्या अन्नाचीही आपत्ती झाली आहे. जागतिक अन्न कार्यक्रम (WFP) ने म्हटले आहे की देशातील 60 लाखांहून अधिक लोक अन्न संकटाचा सामना करत आहेत आणि सध्या 30 लाख लोकांची भूक भागवण्यासाठी 500 कोटी रुपये आवश्यक आहेत.

जागतिक अन्न कार्यक्रम (श्रीलंका) चे राष्ट्रीय प्रमुख अब्दुर रहीम सिद्दीकी म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था सध्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट अन्न संकटाचा सामना करत आहे आणि पुढील काही महिन्यांत महागाई वाढण्याची शक्यता आहे. सिद्दीकी म्हणाले की, श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अन्नधान्याच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. जूनपर्यंत अन्नधान्य महागाईचा दर 80 टक्क्यांच्या वर आहे आणि येत्या काही महिन्यांत हा कल वाढण्याची शक्यता आहे.

एका अभ्यासानुसार, लोकसंख्येच्या सुमारे एक चतुर्थांश, म्हणजे सुमारे 53 लाख लोक एका वेळचे अन्न घेणे कमी केल आहे. श्रीलंकेतील अन्न संकटाच्या काळात काळाची गरज अधोरेखित करताना ते म्हणाले की 2022 च्या अखेरीस WFP ला 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आवश्यक आहे, नाही तर केवळ 30 टक्के लोकांची भूक भागवू शकेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT