PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

भारतासोबत एकत्र काम करण्याची इच्छा: शाहबाज शरीफ

पाकिस्तानमधील सत्ताबदलानंतर भारतासोबतचे संबंधही बदलण्याची चिन्हे दिसून आहेत.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानमधील (Pakistan) सत्ताबदलानंतर भारतासोबतचे (India) संबंधही बदलण्याची चिन्हे दिसून आहेत. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ (PM Shehbaz Sharif) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहून दोन्ही देशांच्या वादग्रस्त मुद्द्यांवर शांततापूर्ण तोडगा काढण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहबाज यांचे हे पत्र पीएम मोदींच्या अभिनंदन संदेशाला उत्तर म्हणून आले. (Pakistan PM Shahbaz Sharif has said he wants to work with India)

शाहबाज यांनी पीएम मोदींचे आभार मानत लिहिले की, प्रदेशात शांतता आणि स्थिरता तसेच जम्मू-काश्मीरसह (Jammu-Kashmir) सर्व वादग्रस्त प्रश्न शांततेने सोडवले जाऊ शकतात तसेच भारत आणि पाकिस्तानमधील शांततापूर्ण संबंध नागरिकांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पीएम नरेंद्र मोदी यांनी शाहबाज शरीफ यांचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले होते, पंतप्रधान बनल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना पीएम मोदी म्हणाले होते की, तुम्हाला पाकिस्तानचे पंतप्रधान बनल्याबद्दल मनस्वी शुभेच्छा. हा प्रदेश दहशतवादमुक्त करून शांतता आणि स्थैर्यासाठी तुम्ही त्यावर काम कराल अशी भारताची अपेक्षा आहे. याद्वारे आपण आव्हाने पेलून आपल्या नागरिकांना चांगले जीवन देऊ शकता.

याला उत्तर देताना शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि म्हणाले की, 'पाकिस्तानला भारतासोबत शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंधच हवे आहेत. काश्मीरसह दोन्ही देशांमधील अनेक प्रश्न शांततेने सोडवण्याची आता गरज आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानने केलेले बलिदान सर्वांच्याच लक्षात आहे.

पंतप्रधान झाल्यानंतर शाहबाज यांनी आपल्या पहिल्या भाषणातही काश्मीरचा स्पष्टपणे उल्लेख केला होता. त्यानंतर ते म्हणाले होते की, मला भारतासोबत शांततेचे संबंध हवे आहेत, जी काश्मीर वादावर तोडगा निघेपर्यंत शक्य नाहीये. शाहबाज यांनी यापूर्वीही अनेक वेळा काश्मीरचा न चुकता उल्लेख केला आहे.

भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत: शाहबाज शरीफ

शाहबाज शरीफ यांनी अनेकदा पाकिस्तानी पंजाब आणि भारतीय पंजाबमध्ये एकत्र काम करण्याबाबत बोलले आहेत. ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. 2017 मध्ये, पंजाब आणि उत्तर भारतात धुक्याची समस्या सुरू होती, तेव्हा शाहबाज शरीफ यांनी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांना पत्र देखील लिहिले होते. त्यात त्यांनी धुराची समस्या आणि प्रदूषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT