काठमांडू: नेपाळमधील जलप्रलयातील बळींचा आकडा सोमवारी ९३९ वर पोहोचला आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण व व्यवस्थापन प्राधिकरणाने सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४,२४७ जण बेपत्ता असून, १०,४५१ जणांची सुटका करण्यात आली आहे.
पूरग्रस्त भागांत बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, अंदाजे २० हजार सुरक्षा कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. बेपत्ता परदेशी नागरिकांची संख्या ५९२ आहे. दरम्यान, नेपाळच्या सैन्याने हवाई बचाव मोहिमेत २५२ परदेशी नागरिकांसह ३,३४४ नेपाळमधील नागरिकांची सुटका केली आहे. पूर आणि भूस्खलनाचा सर्वाधिक फटका चितवन जिल्ह्याला बसला असून, तेथे २७२ मृतदेह आढळले असून, काही ठिकाणी मृतदेहाचे फक्त अवशेष आढळले आहेत.
नवलपरासी (पूर्व) येथे २०७, नवलपरासी (पश्चिम) येथे १५१, नुवाकोटमध्ये ९५, गोरखामध्ये ६२, धादिंगमध्ये ५५, तनहुँमध्ये ३७ आणि रसुवामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये नेपाळ पोलिसांचे २५, नेपाळच्या सैन्याचे ४५ आणि सशस्त्र पोलिस दलाचे १३ कर्मचारी आहेत. याशिवाय सीमाशुल्क कार्यालयातील १५ आणि स्थलांतर विभागातील तीन कर्मचारी बेपत्ता आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.