india accept to pakistan missile firing claim defense ministry issued statement its very very regrettable  Dainik Gomantak
ग्लोबल

पाकचा क्षेपणास्त्रसंदर्भातील दावा भारताला 'कबुल'; पण...

या प्रकरणी संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केलंय

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानने भारताने आपल्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. भारताकडून 124 किमी प्रतितास वेगाने येणारी क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या खानवाल जिल्ह्यात पडल्याचा दावा करण्यात आला होता. आता यावर भारत सरकारकडून स्पष्टीकरण आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्रला आग लागल्याचा दावा करण्यात आला आहे.

याप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. भारत सरकारने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, 9 मार्च रोजी नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्र (missile) कोसळले आहे. भारत सरकारने या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार ते क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या (pakistan) हद्दीत पडले होते. मात्र यामध्ये एकाही नागरिकाला जीव गमवावा लागला नाही.

पाकिस्तानने गुरुवारी दावा केला की भारताकडून (india) एक क्षेपणास्त्र डागण्यात आले जे त्यांच्या पंजाब प्रांतात पडले. आता या प्रकरणी संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, नियमित देखभाल करताना तांत्रिक बिघाडामुळे 9 मार्च रोजी क्षेपणास्त्र कोसळले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT