Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

इम्रान खान यांनी परत केले भारताचे कौतुक

अमेरिकेच्या दबावाला बगल देत भारताने तेल खरेदी केल्यामुळे खान भारतावर खुश आहेत.

दैनिक गोमन्तक

रशियाकडून कमी किमतीत तेल खरेदी केल्याबद्दल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी भारताचे कौतुक केले. अमेरिकेच्या दबावाला बगल देत भारताने तेल खरेदी केल्यामुळे खान भारतावर खुश आहेत. (Former PM of Pakistan Imran Khan praises India again)

याबाबत खान यांनी पाकिस्तान सरकारवर निशाणा साधला. त्यांनी आपल्या देशातील पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) च्या नेतृत्वाखालील सरकारला योजनेशिवाय काम करणे थांबवण्याचा सल्ला दिला.

शेजारील देशाचे माजी पंतप्रधान खान यांची ही प्रतिक्रिया भारत सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांनी कपात केल्यानंतर आली आहे. इम्रान खान यांनी ट्विटमध्ये लिहिले की, क्वाडचा भाग असूनही, अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारताने जनतेला दिलासा देण्यासाठी रशियाकडून अनुदानित दराने तेल खरेदी केले. हेच आमचे सरकार स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या मदतीने साध्य करण्याचे काम करत होते.

इमरान खान म्हणाले की, 'मीर जाफर आणि मीर सादिक तुम्ही बाहेरच्या दबावाला बळी पडला आणि आता नियोजन न करता चारही दिशांना तेलासाठी इकडे तिकडे भटकत आहात.' माजी पंतप्रधानांनी ट्विट केले की आमच्या सरकारसाठी पाकिस्तानचे हित सर्वोच्च आहे, परंतु दुर्दैवाने स्थानिक मीर जाफर आणि मीर सादिक सत्ता परिवर्तनासाठी बाह्य दबावाला बळी पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT