Bilawal Bhutto-Zardari Dainik Gomantak
ग्लोबल

'भारताशी मैत्री करणं अनिवार्य', पाकिस्तानी मंत्र्यांने दिला शाहबाज सरकारला सल्ला

पाकिस्तानने परराष्ट्र धोरणात बदल करण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानने परराष्ट्र धोरणात बदल करण्यास सुरुवात केली आहे. इम्रान खान यांच्या सरकारच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये खूप कटुता दिसून आली. मात्र आता पाकिस्तान हे संबंध सुधारण्यासाठी पावले उचलत आहे. याचा मोठा फटका पाकिस्तानला सहन करावा लागत आहे. त्यामुळेच आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला शाहबाज सरकारला दिला आहे. (bilawal bhutto want good relations with india pakistan)

दरम्यान, बिलावल भुत्तो-झरदारी (Bilawal Bhutto-Zardari) यांनी गुरुवारी भारतासोबतचे संबंध पूर्ववत करण्याचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले की, ''नवी दिल्लीशी संबंध तोडणे देशाच्या हिताचे नाही कारण इस्लामाबाद (Islamabad) आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडले आहे.''

काश्मिरी रागही आवळला

खरं तर, बिलावल इस्लामाबादमधील इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या स्थापना दिनाच्या समारंभाला संबोधित करत होते. बिलावल म्हणाले, ''भारतासोबत आमच्या काही समस्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध आणि संघर्षाचा मोठा इतिहास आहे. आजही आमच्यात अनेक वाद होतात. ऑगस्ट 2019 च्या घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या दिवशी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला. भारताने (India) संविधानातील कलम 370 रद्द केले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील संबंधात कटुता आली.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT