Bilawal Bhutto-Zardari
Bilawal Bhutto-Zardari Dainik Gomantak
ग्लोबल

'भारताशी मैत्री करणं अनिवार्य', पाकिस्तानी मंत्र्यांने दिला शाहबाज सरकारला सल्ला

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानने परराष्ट्र धोरणात बदल करण्यास सुरुवात केली आहे. इम्रान खान यांच्या सरकारच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये खूप कटुता दिसून आली. मात्र आता पाकिस्तान हे संबंध सुधारण्यासाठी पावले उचलत आहे. याचा मोठा फटका पाकिस्तानला सहन करावा लागत आहे. त्यामुळेच आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला शाहबाज सरकारला दिला आहे. (bilawal bhutto want good relations with india pakistan)

दरम्यान, बिलावल भुत्तो-झरदारी (Bilawal Bhutto-Zardari) यांनी गुरुवारी भारतासोबतचे संबंध पूर्ववत करण्याचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले की, ''नवी दिल्लीशी संबंध तोडणे देशाच्या हिताचे नाही कारण इस्लामाबाद (Islamabad) आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडले आहे.''

काश्मिरी रागही आवळला

खरं तर, बिलावल इस्लामाबादमधील इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या स्थापना दिनाच्या समारंभाला संबोधित करत होते. बिलावल म्हणाले, ''भारतासोबत आमच्या काही समस्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध आणि संघर्षाचा मोठा इतिहास आहे. आजही आमच्यात अनेक वाद होतात. ऑगस्ट 2019 च्या घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या दिवशी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला. भारताने (India) संविधानातील कलम 370 रद्द केले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील संबंधात कटुता आली.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT