Amit Mishra announces retirement from cricket Dainik Gomantak
देश

Cricketer Retierment: आशिया कपपूर्वी भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम, IPLमध्ये 3 वेळा घेतलीय हॅटट्रिक

Amit Mishra announces retirement from cricket: भारताच्या स्टार खेळाडूने आशिया कप २०२५ पूर्वी निवृत्तीची घोषणा केली आहे. हा खेळाडू बराच काळ भारतीय संघापासून दूर होता.

Sameer Amunekar

बातमीतील ४ महत्त्वाचे मुद्दे

  • अमित मिश्राची वयाच्या ४२ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा

  • आयपीएलमध्ये ३ वेळा हॅट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज

  • आंतरराष्ट्रीय कारकीर्द

Amit Mishra announces retirement from cricket

आशिया कप २०२५ च्या आधी टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज अमित मिश्राने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने वयाच्या ४२ व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. तो सतत टीम इंडियापासून दूर होता. अमित मिश्राने आयपीएलमध्ये ३ वेळा हॅट्रिक देखील घेतली आहे. याशिवाय, त्याने भारतासाठी उत्कृष्ट गोलंदाजी देखील केली आहे.

वृत्तसंस्था आयएएनएसशी बोलताना अमितने त्याच्या आयुष्यात त्याला साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. तो म्हणाला की, माझ्या क्रिकेटमधील आयुष्यातील ही २५ वर्षे संस्मरणीय राहिली आहेत. या काळात माझ्यासोबत असलेल्या बीसीसीआय, प्रशासन, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, सपोर्ट स्टाफ, माझे सहकारी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो.

अमित मिश्राने आयपीएलमध्ये ३ वेळा हॅट्रिक घेतली आहे. त्याने २००८, २०११ आणि २०१३ मध्ये ही कामगिरी केली होती. आयपीएलमध्ये ३ हॅट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. अमितने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद, डेक्कन चार्जर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळला आहे.

मिश्राने २०२४ मध्ये शेवटचा आयपीएल हंगाम खेळला होता. एलएसजीने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला होता. तथापि, या हंगामात तो फक्त १ सामना खेळू शकला. त्याने १ बळी घेतला. मिश्राने २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

त्यानंतर २००८ मध्ये मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध या स्टार गोलंदाजाने पदार्पण केले. २०१० मध्ये त्याने हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केले. परंतु तो टीम इंडियामध्ये सातत्यपूर्ण खेळू शकला नाही.

अमित मिश्राने भारतासाठी २२ कसोटी सामन्यांमध्ये ७६ बळी घेतले. याशिवाय, त्याने ३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६४ बळी घेतले आहेत. त्याने १० टी-२० सामन्यांमध्ये १६ बळी घेतले आहेत. त्याने भारतासाठी शेवटचा सामना २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.

प्रश्न 1: अमित मिश्राने कोणत्या वयात आणि कोणत्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली?
उत्तर: त्याने वयाच्या ४२ व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.

प्रश्न 2: आयपीएलमध्ये अमित मिश्राचा विशेष विक्रम कोणता आहे?
उत्तर: आयपीएलमध्ये ३ वेळा (२००८, २०११, २०१३) हॅट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

प्रश्न 3: अमित मिश्राने भारतासाठी किती बळी घेतले आहेत?
उत्तर: त्याने २२ कसोट्यांत ७६, ३६ एकदिवसीय सामन्यांत ६४ आणि १० टी-२० सामन्यांत १६ बळी घेतले आहेत.

प्रश्न 4: आपल्या निवृत्तीवेळी अमित मिश्राने कोणाचे आभार मानले?
उत्तर: त्याने बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, सहकारी खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कुटुंबीयांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT