Tilak Verma  Dainik Gomantak
देश

Tilak Varma: "पाकिस्तान आमच्यासमोर टिकू शकत नाही..." आशिया कप फायनलचा हिरो तिलक वर्माची पाकिस्तानवर थेट टीका

Tilak Varma On Pakistan: पाकिस्तानविरुद्ध नाबाद 69 धावांची मॅच-विनिंग खेळी खेळून भारताला चॅम्पियन बनवणारा युवा फलंदाज तिलक वर्मा सध्या जगभर चर्चेत आहे.

Manish Jadhav

Tilak Varma On Pakistan: आशिया कप 2025 च्या फायनल सामन्यात पाकिस्तानविरुद्ध नाबाद 69 धावांची मॅच-विनिंग खेळी खेळून भारताला चॅम्पियन बनवणारा युवा फलंदाज तिलक वर्मा सध्या जगभर चर्चेत आहे. 28 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये झालेल्या हाय-व्होल्टेज फायनलमध्ये तिलकने 53 चेंडूत 3 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार लगावले. त्याच्या या खेळीच्या जोरावरच टीम इंडियाने शेवटच्या षटकात थरारक विजय नोंदवत विजेतेपद पटकावले.

फायनल सामन्याचा हा हिरो 29 सप्टेंबर रोजी आपल्या घरी हैदराबाद येथे पोहोचला. हैदराबाद विमानतळावर त्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना तिलक वर्माने कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या वक्तव्याला दुजोरा देत, पाकिस्तान संघ सध्या भारताची बरोबरी करण्याच्या स्थितीत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

'आता कोणताही मोठा मुकाबला नाही'

माध्यमांशी बोलताना तिलक म्हणाला की, "कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. आता भारत-पाकिस्तान (Pakistan) हे कट्टर प्रतिस्पर्धी (Big Rivalry) राहिले नाहीत. पाकिस्तानचा संघ सध्या टीम इंडिया समोर टिकू शकत नाही." मात्र, प्रत्येक संघाप्रमाणे पाकिस्ताननेही वेगवेगळे प्लॅन्स केले होते, हेही त्याने मान्य केले.

तिलकने पुढे सांगितले की, भारत-पाकिस्तान सामन्यात नेहमीच दबाव (Pressure) असतो. 147 धावांचे लक्ष्य गाठत असताना निश्चितच माझ्यावर प्रचंड दबाव होता. पण, त्यावेळी माझ्या मनात फक्त आणि फक्त देशाला विजय मिळवून देणे हेच प्राधान्य होते. 140 कोटी भारतीयांसाठी सामना जिंकणे, हेच माझे एकमेव उद्दिष्ट होते.

स्लेजिंगवर बॅटने दिले उत्तर

तिलक जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा भारताची (India) धावसंख्या केवळ 10 धावांवर 2 विकेट्स अशी होती आणि लवकरच ती 20/3 अशी झाली. या अत्यंत कठीण परिस्थितीत पाकिस्तानी खेळाडू मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, असेही त्याने सांगितले.

तिलक पुढे म्हणाला, "आम्ही तीन विकेट गमावताच पाकिस्तानचे खेळाडू आमच्यावर स्लेजिंग करुन वरचढ होण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी फायनलमध्ये स्लेजिंग तर खूप केली, पण माझ्या मनात हे स्पष्ट होते की, मला त्यात अडकून पडायचे नाही. कारण माझ्यासाठी देशाला जिंकवून देणे महत्त्वाचे होते. त्यामुळे मी माझ्या बॅटनेच त्यांना उत्तर दिले."

शेवटी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कामगिरीला 'ऑपरेशन सिंदूर'प्रमाणे 'ऑपरेशन तिलक' असे नाव दिल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांकडून मिळालेले हे कौतुक माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे, अशी भावना तिलक वर्माने व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dindi Utsav: 1909 साली गोव्यात पोर्तुगीज राजवट होती, लोटलीकर चाळीत मंदिराची स्थापना करण्यात आली; 'दिंडी उत्सवा'चे बदलते रुप

कुठ्ठाळीत स्थलांतरीतांना हवाय कन्नड आमदार?? कन्नड महासंघाची मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याकडे मागणी

Goa Opinion: आमच्या टेकड्या सपाट होत आहेत, नद्या प्रदूषित होत आहेत, मासेमारीच्या जाळ्यातून सूटून 'गोवा' इंटरनेटच्या जालात अडकला आहे

Rohit Sharma Emotional: जल्लोष मैदानात, पण कॅमेऱ्यामनची नजर स्टँड्सवर! टीम इंडिया विश्वविजेता होताच 'मुंबईचा राजा' भावुक Video Viral

आम्हाला घाटी म्हणून हिणवू नका! गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र एकमेकांचे भाव; कन्नड मेटी यांनी तुकारामांना जोडले हात

SCROLL FOR NEXT