Team India Dainik Gomantak
देश

Ind vs Aus 2nd ODI: टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियात 'मैदान-ए-जंग', ॲडलेडमध्ये लकी रेकॉर्ड; 17 वर्षांपासून या मैदानावर भारताचा पराभव नाही!

Team India Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आता 23 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.

Manish Jadhav

Team India Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आता 23 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. टीम इंडिया या मालिकेत सध्या 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाला दुसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. अशा तणावाच्या परिस्थितीत टीम इंडियाचा नवा वनडे कर्णधार शुभमन गिल याच्यासाठी ऑस्ट्रेलियातून एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

जो विक्रम गेल्या 17 वर्षांपासून मोडलेला नाही, त्याच विक्रमाची परंपरा गिलला पुढे न्यायची आहे. जर गिलने हे आव्हान यशस्वीपणे पेलले, तर केवळ मालिका 1-1 ने बरोबरीत येईल असे नाही, तर मालिका जिंकण्याची संधीही पुन्हा निर्माण होईल.

भारतासाठी 'लकी' ॲडलेडचे मैदान

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना ॲडलेड येथे खेळला जाणार आहे. ॲडलेड हे ऑस्ट्रेलियातील शहर असले तरी क्रिकेटच्या दृष्टिकोनातून हे मैदान टीम इंडियासाठी खूप 'लकी' मानले जाते. सर्वात विशेष बाब म्हणजे या ॲडलेड ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाने गेल्या जवळपास 17 वर्षांपासून एकही वनडे सामना गमावलेला नाही. एका अर्थाने, या मैदानाचे वर्णन 'भारताबाहेरील भारताचा मजबूत किल्ला' असे केले तर ते वावगे ठरणार नाही.

या 17 वर्षांच्या कालावधीत भारताने येथे जास्त सामने खेळले नाहीत, पण जे काही 5 वनडे सामने झाले, त्यापैकी एकाही सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला नाही. टीम इंडिया (Team India) या मैदानावर शेवटची पराभूत झाली होती, ती घटना 2021 मधील आहे. तेव्हा त्रिकोणीय मालिका खेळली जात होती आणि श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही संघाने टीम इंडियाला ॲडलेडमध्ये हरवलेले नाही.

गिलला करावी लागेल मोठी खेळी

गिलने जर ही आकडेवारी पाहिली तर त्याला नक्कीच मोठा दिलासा मिळेल. पर्थ येथे खेळला गेलेला पहिला वनडे सामना टीम इंडिया हारली आहे. आता मालिकेत पुनरागमन करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दुसरा सामना जिंकणे आणि तो केवळ जिंकणेच आहे. पहिल्या वनडेत विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचीही बॅट शांत राहिली, तसेच कर्णधार गिललाही मोठी खेळी साकारता आली नाही.

पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यामुळे आता किमान दुसरा सामना पूर्ण व्हावा, जेणेकरुन दोन्ही संघांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची पुरेशी संधी मिळेल.

शुभमन गिल वनडेमध्ये पहिल्यांदाच टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. कर्णधार म्हणून गिलच्या कारकिर्दीची सुरुवात ऑस्ट्रेलियातील या 'लकी' मैदानावर विजयाने व्हावी, अशी अपेक्षा आहे. कर्णधार म्हणून संघाला प्रेरणा देतानाच, गिलला फलंदाज म्हणूनही मोठी आणि निर्णायक खेळी खेळावी लागणार आहे, कारण संघातील सर्व खेळाडूंकडून आता मोठी खेळी अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT