COVID-19 second wave Dainik Gomantak
देश

COVID-19 ची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही: केंद्रीय आरोग्य मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे (Union Health Ministry) जॉईन सेक्रेटरी लव आग्रवाल यांनी ही माहीती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना महामारीच्या (COVID-19) तीसऱ्या लाटेबद्दल वेगवेगळ्या शंका व्यक्त केल्या जात असतानाच आता अजुन एक चिंता वाढवणारी माहीती समोर आली आहे. जगभरात आजही मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची प्रकरणे नोंदवली जात आहेत. त्यामुळे कोरोना विषाणुची साथ अजूनही संपलेली नाही. या सर्व परिस्थितीमध्ये भारताचा विचार केल्यास भारतातील दुसरी लाट अजूनही संपलेली नाही असे विधान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे जॉईन सेक्रेटरी लव आग्रवाल यांनी केले आहे.

दरम्यान, तिसऱ्या लाटेचा विचार केल्यास संशोधकांच्या एका गटाने केलेल्या अभ्यासानुसार भारतात ऑगस्टमध्ये कोविड -19 प्रकरणांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, त्यांनी असेही म्हटले आहे की, ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कमी धोकादायक असू शकते.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे एपिडेमिओलॉजी आणि संसर्गजन्य रोग प्रमुख डॉ.समीरन पांडा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोविड -19 ची तिसरी लाट आली तर ती ऑगस्टच्या अखेरीस येईल.

तिसऱ्या लाटेत दररोज 100,000 ते 150,000 संसर्गाची प्रकरणे नोंदविली जाऊ शकते असा दावा हैदराबाद आणि कानपूर येथील इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT मध्ये मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनींद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनातून समोर आले आहे.


दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT