Rakshabandhan to gods Dainik Gomatnak
देश

Raksha Bandhan: 'या' देवांना राखी बांधा, संकटाना दूर पळवा! जाणून घ्या रक्षाबंधनाचे महत्व

Raksha bandhan traditions: रक्षाबंधन हा अत्यंत पवित्र आणि भावनिक सण असून, भावंडांमधील प्रेम आणि संरक्षणाचे नाते साजरे करण्याचा दिवस आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातात राखी बांधून प्रार्थना करतात.

Sameer Panditrao

पुणे : रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि भावनिक सण असून, भावंडांमधील प्रेम आणि संरक्षणाचे नाते साजरे करण्याचा दिवस आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातात राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. मात्र, केवळ भावांनाच नव्हे तर काही देवतांनाही रक्षा सूत्र बांधण्याची परंपरा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. मान्यता अशी आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी विशिष्ट रंगाच्या राख्या विशिष्ट देवतांना बांधल्यास जीवनात सुख, समृद्धी आणि संकटांपासून संरक्षण मिळते.

भोलेनाथाला बांधा हिरव्या रंगाची राखी

सावन पौर्णिमा, म्हणजेच रक्षाबंधनाचा दिवस, हा शंकर भगवानाशी विशेषतः संबंधित मानला जातो. भोलेनाथाला हिरव्या रंगाची राखी बांधल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो, असे शास्त्र सांगते. शांती, सात्विकता आणि नैसर्गिक ऊर्जा यांचे प्रतीक असलेला हिरवा रंग भोलेनाथाला अत्यंत प्रिय आहे.

गणपती बाप्पाला बांधा लाल राखी

विघ्नहर्ता श्री गणेश हे सर्व कार्यांच्या आधी पूजले जातात. त्यांना लाल रंगाची राखी बांधल्यास जीवनातील सर्व अडचणी, अडथळे दूर होतात आणि कार्यसिद्धी मिळते. लाल रंग ऊर्जा, उत्साह आणि यशाचे प्रतीक आहे. म्हणूनच रक्षाबंधनाला प्रथम गणेशजींना राखी अर्पण केली जाते.

हनुमानजींसाठी लाल किंवा केशरी राखी

शौर्य, पराक्रम आणि बुद्धी यांचे प्रतीक बजरंगबली हनुमानजींना राखी बांधल्यास बल, साहस, आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. तसेच, मंगळ दोष आणि नकारात्मकतेपासूनही बचाव होतो. लाल किंवा केशरी रंगाची राखी हनुमानजींसाठी विशेष शुभ मानली जाते.

श्रीकृष्णाला बांधा निळी राखी

रक्षाबंधनाचा संबंध महाभारतातील द्रौपदी आणि श्रीकृष्णाच्या कथााशी आहे. द्रौपदीने कृष्णाला जेव्हा राखी बांधली, तेव्हा त्यांनी तिला आजन्म संरक्षणाचे वचन दिले. श्रीकृष्णाला निळ्या रंगाची राखी बांधल्यास जीवनातील दुःख दूर होतात आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते. निळा रंग विश्वास, अध्यात्मिकता आणि निष्ठेचे प्रतीक आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने देवतांना राखी बांधण्याची ही परंपरा भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचा संगम आहे. योग्य रंगाची राखी आणि भक्तिभावाने केलेली पूजा नक्कीच जीवनात सौख्य आणि समृद्धी घेऊन येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT