Rahul Gandhi  
देश

'मोहन भागवत जरी विरोधात बोलले तरी मोदी त्यांना आतंकवादी ठरवतील'

दैनि्क गोमन्तक वृत्तसेवा

नवी दिल्ली- केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात 29 दिवसांपासून पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीच्या बाहेरच रोखून धरले असून दिल्लीत मात्र विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी कृषी कायद्यांना विरोध कऱताना पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, 'मोदी यांच्या विरोधात बोलणाऱ्याला आतंकवादी म्हटले जाईल मग ते मोहन भागवत जरी असले तरी'.   

 राहूल गांधी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी एका पत्रकाराने त्यांना लोकशाहीवर प्रश्न विचारला असता त्यांनी भारतात लोकशाही राहिली नसल्याचे म्हटले आहे.  देशात कोणतीही लोकशाही नाही. ती कल्पनेत असू शकते. मात्र, वास्तवात लोकशाही अस्तित्वात नाही.  नेत्यांना तुरूंगात डांबणे या सरकारच्या काळात एक सामान्य गोष्ट झाली आहे.  

'आपल्यात एक अक्षम व्यक्ति आहे, ज्याला काहीही समजत नाही. जो केवळ तीन चार लोकांच्या हितासाठी साऱ्या देशाची यंत्रणा राबवत आहे', असा आरोप करत गांधी यांनी पंतप्रधान मोदी भांडवलदारांसाठी पैसा उपलब्ध करत असल्याचेही म्हटले. 'जो त्यांच्या विरोधात बोलेल त्याला आतंकवादी म्हटले जाईल. मग तो शेतकरी असो, मजूर असो  किंवा मग मोहन भागवत असोत', अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

कृषी कायद्यांवर बोलताना राहूल गांधी म्हणाले की, 'हे कायदे जबरदस्ती लादण्यात आले असून आम्ही राष्ट्रपतींना याबाबत निवेदन दिले आहे. यात कोट्यवधी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे कायदे शेतकऱ्यांच्या विऱोधात असल्याचे आम्ही राष्ट्रपतींना सांगितले आहे. शेतकरी या कायद्यांना विरोध करण्यासाठी पेटून उठले आहेत.' 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT