PostMortem Dainik Gomantak
देश

सूर्यास्तानंतर मृतदेहांचे विच्छेदन करता येईल; केंद्र सरकार मोठा निर्णय

सूर्यास्तानंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करत असताना हत्या, आत्महत्या, बलात्कार, छिन्नविछिन्न मृतदेह आणि संशयास्पद प्रकरणांना यातून वगळण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: भारतामध्ये सूर्यास्तानंतर शवविच्छेदन (PostMortem) करण्यास परवानगी नव्हती. आजपासून संपूर्ण देशात सूर्यास्तानंतरही मृतदेहांचे शवविच्छेदन करता येईल. असा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Union Ministry of Health) घेण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandvia) यांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. या निर्णयानंतर ज्या रुग्णालयांमध्ये रात्री शवविच्छेदन करण्यासाठी सुविधा असेल त्यांना सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येईल.

हत्या, आत्महत्या, बलात्कार, विछिन्न असलेले मृतदेह आणि संशयास्पद प्रकरणे सोडून योग्य पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये सूर्यास्तानंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यास परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे. तसेच अवयवदानासाठी सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येणार आहे असा ही उद्देश असल्याची माहिती सूत्रांनी मिळाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या आरोग्य सेवा महासंचालनालयातील समितीने सूर्यास्तानंतर शवविच्छेदनाच्या बाबतची तपासणी केली. यामध्ये काही संस्था रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करत आहेत अशी चर्चा या बैठकीदरम्यान झाली. तसेच वाढत्या तंत्रज्ञानातील (Technology) वेगवान प्रगती आणि सुधारणांचा विचार करता शवविच्छेदनसाठी आवश्यक प्रकाश आणि आवश्यक पायाभूत सुविधांची उपलब्धता असलेल्या रुग्णालयांमध्ये (hospital) रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT