Asaduddin Owaisi Dainik Gomantak
देश

हा 'सेक्युलर' अजेंडा आहे का?, राहुल गांधींच्या वक्तव्यावर ओवेसींचा सवाल

असदुद्दीन ओवेसी यांनी जयपूरमधील महागाई हटाओ रॅलीतील राहुल गांधींच्या हिंदू आणि हिंदुत्वाबाबत केलेल्या वक्तव्यावर सवाल केला आहे

दैनिक गोमन्तक

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी आगामी निवडणुकांसाठी हिंदू अजेंडा पकडला आहे. या संदर्भात काँग्रेसने जयपूरमध्ये महागाई हटाओ रॅलीही काढली आहे. त्यात राहुल गांधींनी 'हिंदू आणि हिंदुत्व' असं वक्तव्य केलं आहे. त्यात ते म्हणाले की, आता हिंदूंना सत्तेत आणायचे आहे, हिंदुत्ववाद्यांना नाही. या विधानानंतर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी राहुल गांधींना धारेवर धरले आहे.

हाच धर्मनिरपेक्ष अजेंडा काँग्रेसने ठेवला आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी जयपूरमधील महागाई हटाओ रॅलीतील राहुल गांधींच्या हिंदू आणि हिंदुत्वाबाबत केलेल्या वक्तव्यावर सवाल केला आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे.

2021 मध्ये हिंदूंना सत्तेवर आणण्यासाठी धर्मनिरपेक्ष अजेंडा तयार करण्यात आला आहे, असा टोमणा ओवेसी यांनी मारला आहे. यासोबतच ओवेसी म्हणाले की, भारत सर्वांचा आहे. हा देश एकट्या हिंदूंचा नाही. भारत हा सर्व धर्माच्या लोकांचा आहे आणि कोणत्याही धर्मावर श्रद्धा नसलेल्या लोकांचाही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

Goa Drug Case: कपड्यांखाली लपवले होते 3 कोटींचे ड्रग्स! मोपा विमानतळावरून विदेशी पर्यटकाला अटक

MI VS RCB: 6,4,6,4... नॅडिन डी क्लार्कची झुंजार खेळी, आरसीबीनं मुंबईच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास Watch Video

Shukra Budh Yuti 2026: धनिष्ठा नक्षत्रात 'लक्ष्मी-नारायण' योग: 'या' 4 राशींना मिळणार अपार यश आणि धनदौलत!

Goa Nightclub Fire: 'बर्च' घटना अपघात म्हणून सोडून द्यावी? 25 जण जिवंत जळाले तरी सरकार गप्प का? युरी आलेमाव यांचा सवाल

SCROLL FOR NEXT