Political dissent in Bihar over ban on liquor
Political dissent in Bihar over ban on liquor 
देश

बिहारमध्ये दारुबंदीवरून राजकीय विसंवाद

गोमन्तक वृत्तसेवा

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दारुबंदीवरुन राजकीय वाद झडू लागले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम)चे राष्ट्रीय अध्यक्ष जितनराम यांनी ‘दारुबंदी कायद्यावर पुनर्विचार होणे आवश्‍यक आहे. कारण या कायद्यामुळे अनेक निरपराध व्यक्तींना तुरुंगवास घडला आहे, असे वक्तव्य करून राजकीय वाद निर्माण केला आहे. 

लोकजनशक्तीचे अध्यक्ष चिराग पासवान बेगूसराय येथील सभेत म्हणाले की, बिहारमध्ये दारुबंदी केली तरी मोठ्या-मोठ्या लोकांकडे घरपोच दारू पोचवली जात आहे आणि ज्याचे कमिशन सर्वांकडे जाते. याआधी काँग्रेसनेही त्यांच्या जाहीरनाम्यात दारूबंदीची समीक्षा करावी, अशी मागणी केली आहे. मांझी म्हणाले की, हा कायदा गरिबांविरोधात आहे. यामुळे अनेक दलित आणि महादलित लोकांना तुरुंगात पाठविले. या कायद्याचे पालन योग्य रीतीने होत नाही. पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या बड्या माफियांविरोधात कारवाई करण्याऐवजी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना अटक करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT