pm modi Dainik Gomantak
देश

गरिबीपासून महामारीपर्यंत, पंतप्रधान मोदींनी लोकसभेत काँग्रेसला दिले उत्तर

पीएम मोदींनी गरिबीपासून शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर बोलून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

दैनिक गोमन्तक

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरू आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर प्रतिक्रिया देत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. सर्वप्रथम लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आणि देशाने आदरणीय लतादीदी गमावल्या आहेत. इतके दिवस त्यांच्या आवाजाने देशाला प्रेरणा दिली, असे म्हणत यानंतर पीएम मोदींनी गरिबीपासून शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर बोलून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. जाणून घेवून त्यांच्या भाषणातील महत्त्वाच्या गोष्टी-

PM मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

1. गरीब देखील करोडपतींच्या श्रेणीत आले आहेत. गरिबांचा आनंद देशाला बळ देतो. गरिबांच्या घरात गॅस कनेक्शन आहे. शौचालय आहे. स्टोव्हच्या धुरातून गरीबांच्या आईची सुटका झाली आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर गरीबाच्या घरात प्रकाश पडला, तर त्याचा आनंद देशाच्या सुखाला बळ देतो.

2. लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आणि म्हणाले की, प्रचारक विसरतात की त्यांनी 50 वर्षे देशावर राज्य केले. काही लोकांना फक्त जागे व्हायचे नसते. त्याचे परिणामही तुम्हाला भोगावे लागले आहेत.

3. पीएम मोदी म्हणाले, "पराभवानंतरही काँग्रेसचा अहंकार दूर होत नाही. प्रश्न मताचा नसून नशिबाचा आहे. यूपी, बिहार, गुजरातमध्ये काँग्रेसची अवस्था वाईट आहे. 60 वर्षे तामिळनाडूमध्ये काँग्रेसची सत्ता आली नाही. तिथल्या जनतेने 34 वर्षांपूर्वी 1988 मध्ये त्रिपुरामध्ये शेवटच्या वेळी तुम्हाला मतदान केले होते. 50 वर्षांपूर्वी 1972 मध्ये पश्चिम बंगालच्या लोकांनी तुम्हाला शेवटचे पसंत केले होते."

4. पीएम मोदी म्हणाले, 'महामारीच्या काळात काँग्रेसने मर्यादा ओलांडल्या आहेत. पक्षाने राजकारण केले, लोकांना तिकीट देऊन कोरोना पसरवला. पहिल्या लाटेत, जेव्हा देश लॉकडाऊनचा अवलंब करत होता, जेव्हा WHO जगाला सल्ला देत असे, तेव्हा सर्व आरोग्य तज्ञ सांगत होते जिथे आहे तिथेच रहा. मग मुंबईच्या रेल्वे स्थानकावर काँग्रेसचे लोक उभे राहिले आणि त्यांना मुंबईतील कार्यकर्त्यांना जाण्यासाठी तिकीट देण्यात आले, लोकांना जाण्यास प्रवृत्त केले होते.'

5. काव्यात्मक शैलीत काँग्रेसवर निशाणा साधताना पीएम मोदी म्हणाले, "वो जब दिन को रात कहें, तो तुरंत मान जाओ. नहीं मानोगे तो वो दिन में नकाब ओढ़ लेंगे. जरूरत हुई तो हकीकत को थोड़ा बहुत मरोड़ लेंगे, वो मगरूर हैं खुद की समझ पर बेइंतहा, इन्हें आईना मत दिखाओ, वो आईने को भी तोड़ देंगे. ”

7. पंतप्रधान लोकसभेत म्हणाले, काँग्रेसला छोट्या शेतकऱ्यांची समस्या आहे. छोट्या शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने मोठे निर्णय घेतले, मात्र लोकांना छोट्या शेतकऱ्यांचे प्रश्न समजू शकत नाहीत. काही लोक अजूनही गुलामगिरीच्या मानसिकतेत जगत आहेत. काँग्रेस फायलींमध्ये हरवली आहे, आम्ही जीवन बदलत आहोत. जुने कायदे 21व्या शतकातील स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. देशात महामार्ग, रेल्वे मार्ग बांधले जात आहेत. आत्मनिर्भर भारतावर आमचा भर आहे.

8. पंतप्रधान म्हणाले, फक्त सरकार सर्व समस्या सोडवू शकत नाही. 2014 पूर्वी आपल्या देशात केवळ 500 स्टार्ट-अप होते, परंतु गेल्या 7 वर्षात देशात 60 हजारांहून अधिक स्टार्ट-अप कार्यरत आहेत. यातून आपल्या तरुणांची ताकद दिसून येते.

9. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'इतरांवर अवलंबून राहणे या देशाची सुरक्षा सुनिश्चित करू शकत नाही. संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होणे हे देशसेवेचे मोठे काम आहे. मी देशातील तरुणांनाही आवाहन करतो की, तुम्ही तुमचे क्षेत्र निवडा, आम्ही ताकदीने तुमच्या पाठीशी उभे राहू. पूर्वी ते संरक्षण उपकरणांसाठी परदेशांवर अवलंबून होते. आम्ही देशातच अधिकाधिक संरक्षण उत्पादने बनवू. भारत एक मोठा संरक्षण निर्यातदार बनणार आहे.'

10. महागाईवर बोलताना पीएम मोदी म्हणाले, काँग्रेस सरकारमध्ये महागाई दोन अंकी होती. चिदंबरम अर्थव्यवस्थेवर वर्तमानपत्रात लेख लिहितात. काँग्रेस नेते महागाईवर असंवेदनशील होते. 2012 मध्ये यूपीए सरकारने महागाईबाबत असंवेदनशीलता दाखवली. कोरोनाच्या काळातही आम्ही महागाई नियंत्रणात ठेवली.

11. पीएम मोदी म्हणाले की, विरोधकांनी आत्मनिर्भर भारत आणि योगाची खिल्ली उडवली. जर आपण स्थानिकांसाठी आवाज उठवण्याचे बोलत आहोत, तर आपण महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करत नाही आहोत का? मग विरोधकांकडून त्याची खिल्ली का उडवली जात होती? आम्ही योग आणि फिट इंडियाबद्दल बोललो, पण विरोधकांनी त्याची नेहमीच खिल्ली उडवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

IPL 2026: Believe Mumbai Indians! 'हिटमॅन'च्या मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी; 'असा' आहे क्वालिफिकेशनचा फॉर्म्युला

SCROLL FOR NEXT